लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, महायुतीच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं

लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, महायुतीच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं

राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन देत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुका जिंकताच त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला. दरम्यान राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

”लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केल्यास, निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिलं जातं”, असं ते म्हणाले. बाबासाहेब पाटील यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

चोपडा येथील दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बाबासाहेब पाटील बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;