लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, महायुतीच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं

लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, महायुतीच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं

राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन देत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुका जिंकताच त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला. दरम्यान राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

”लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो. निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या, अशी मागणी केल्यास, निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिलं जातं”, असं ते म्हणाले. बाबासाहेब पाटील यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

चोपडा येथील दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बाबासाहेब पाटील बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ? केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ?
हाय युरिक एसिड म्हणजे हायपरयूरिसीमिया आता केवळ सांधेदुखीची समस्या न रहाता किडनी आणि मेटाबॉलिझमला देखील प्रभावित करत आहे. शरीरात युरिक...
प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली, 14 जणांचा मृत्यू
अमृतसर-पूर्णिया जनसेवा एक्सप्रेसमध्ये भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
पोलीस असल्याचे सांगत घरात शिरले, सात जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगणारी, गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या; हर्षवर्धन सपकाळ
त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा
Jammu Kashmir – राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा बोलबाला, तीन जागांवर विजय; भाजपला एक जागा