भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक आजपासून पुन्हा सेवेत, अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांना दिलासा

भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक आजपासून पुन्हा सेवेत, अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांना दिलासा

पावसाळी हंगामामुळे बंद असलेली भाऊचा धक्का ते रेवस प्रवासी बोटसेवा शुक्रवार १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. सकाळी साडेसहा वाजता भाऊचा धक्का येथून पहिली बोट सोडण्यात येणार असून ४ वाजता शेवटची बोट सोडण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेने दिली. साडेचार महिन्यांनंतर ही सागरी मार्गावरील सेवा सुरू झाल्याने अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो पर्यटकांची गैरसोय दूर होऊन दिलासा मिळणार आहे.

हवामानातील बदल, वादळ, मुसळधार पाऊस, समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाऊचा धक्का रेवस, मोरा-भाऊचा धक्का, गेट वे-मांडवा अशा सागरी महामार्गावरील बोटसेवा बंद करण्यात आल्या होत्या. पावसाळी हंगामात जलवाहतूक संस्थेमार्फत दरवर्षी ही बोटसेवा बंद केली जाते. यातील मोरा- भाऊचा धक्का, गेट वे-मांडवा बोटसेवा दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. मात्र भाऊचा धक्का ते रेवस मार्गावरील बोटसेवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र पावसाने आता उसंत घेतल्यानंतर ही बोटसेवा १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.

हवामानानुसार वेळापत्रकात बदल

खोल समुद्रातील चक्रीवादळांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन एखादी दुर्घटना होऊ नये, तसेच परतीच्या पावसामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अशा काळात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात येणार असल्याची माहिती जलवाहतूक संस्थेतर्फे देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा
आजच्या काळात अनेकांना त्वचेच्या संबंधित समस्यांनी ग्रासलेले आहे. परंतू आयुर्वेदातील पतंजलीची दिव्य डर्माग्रिट हे औषध यावर फायदेशीर असल्याचे म्हटले जात...
Jammu Kashmir – राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा बोलबाला, तीन जागांवर विजय; भाजपला एक जागा
Asia Cup 2025 – मोहसीन नक्वी ACC कार्यालयातून ट्रॉफी घेऊन गायब!
हरयाणात भाजपचे ऑफिस बांधण्यासाठी झाडं तोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
उड्डाण घेताच विमान कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी, दोघांचा होरपळून मृत्यू; दोन जण गंभीर भाजले
उत्तर प्रदेशमध्ये महिला भाजप नेत्याचे आंदोलन, गुंडांनी पती आणि मुलाला मारल्याचा केला आरोप
‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या