यादीतून वगळण्यात आलेल्या साडे तीन लाख मतदारांना दाद मागण्याचा अधिकार, SIR वर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

यादीतून वगळण्यात आलेल्या साडे तीन लाख मतदारांना दाद मागण्याचा अधिकार, SIR वर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयात एसआयआर प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, “या कार्यवाहींच्या निकालापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे अंतिम यादीतून वगळलेल्या सुमारे 3.66 लाख मतदारांना अपील करण्याचा हक्क सुनिश्चित करणे ही एक मोठी आव्हानात्मक बाब आहे असे कोर्टाने म्हटले आहे.

तसेच निवडणूक आयोगाने असा दृष्टिकोन घेतला आहे की जणू प्रत्येक व्यक्तीला वगळण्याची कारणे सांगून आदेश देण्यात आले आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. याचिकाकर्त्यांनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे, मात्र अपील दाखल करण्याची मुदत कमी होत असल्याने आम्ही आयोगाची ही भूमिका योग्य मानतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सचिवांनी त्वरित प्रत्येक गावात कादयेविषयक स्वयंसेवकांचे मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण माहिती पुन्हा जाहीर करावी असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. हे स्वयंसेवक अंतिम यादीतून वगळलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करतील. पीएलव्ही (पॅरालीगल व्हॉलंटियर्स) अशा व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना अपीलच्या अधिकाराबद्दल माहिती देतील, अपीलचा मसुदा तयार करण्यात मदत करतील आणि मोफत कायदेशीर सल्ला देतील. एसएलएसए (राज्य विधिक सेवा प्राधिकरण) ही संपूर्ण माहिती गोळा करून एक आठवड्यात न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर करेल असेही कोर्टाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या ‘हे’ दोन देश अजूनही मुलांना अपंग करणाऱ्या ‘या’ आजाराशी झुंज देत आहे, जाणून घ्या
जागतिक स्तरावर संसर्गजन्य रोगांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. काही आजार फार जीवघेणा नसतात, परंतु यामुळे आजीवन अपंगत्वासारख्या समस्यांचा धोका...
गर्भवती होण्यासाठी योग्य वय काय? जाणून घ्या
Mumbai News – आधी ब्रेकअप मग पॅचअपचा प्रयत्न, भेटायला बोलावून प्रेयसीवर हल्ला करत प्रियकराने जीवन संपवलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडे यांची मागणी
अफगाणिस्तानला दुहेरी झटका, झिम्बाब्वेने केलं धोबीपछाड आणि ICC ने सर्व संघाला ठोठावला दंड; तब्बल 12 वर्षांनी…
Ahilyanangar news – आई ‘वाघिण’ बनली अन् बिबट्याशी झुंज देत 5 वर्षांच्या मुलाची सुटका केली, शिंगणापूरमधील थरार
अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल; 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप