Beed news – धारूर तालुक्यात मुसळधार, वाण नदीला आलेल्या पुरात कार आणि रिक्षा वाहून गेली, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता

Beed news – धारूर तालुक्यात मुसळधार, वाण नदीला आलेल्या पुरात कार आणि रिक्षा वाहून गेली, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता

धारूर तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर आला असून धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. या पाण्याच्या प्रवाहात रात्री चार चाकी कार आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे जण बेपत्ता झाले होते. यातील एकाचा मृतदेह सापडला असून अद्याप एकजण बेपत्ता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून तांदळवाडी धरण भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे आवरगाव व अंजनडोह येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी रात्री रूईधारूरहून अंजनडोहकडे जाताना रात्री 8 वाजता आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे (४२) यांची कार पुलावरून वाहून गेली. प्रशासन, पोलीस व गावकर्‍यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवली. अखेर गुरूवारी सकाळी सहा वाजता पुलापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेहाचा सापडला.

आवरगाव येथे तरूण बेपत्ता

दरम्यान, आवरगाव पुलावरूनही रात्री बारा वाजता एक रिक्षा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात अनिल बाबुराव लोखंडे (२६) हा तरूण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नदी, नाला किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच प्रयाण करावे, असा इसारा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल
नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, सुप्रिया सुळे यांची टीका
काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानात आगीची शंका, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
Sindhudurg News – जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यावर दगड मारला, वडील आणि भावावर कोयता उगारला
रत्नागिरी तिहेरी हत्याकांड प्रकरण, दुर्वास पाटीलसह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले
छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा