Latur News – मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील 39 मार्गांवरील वाहतूक प्रभावित

Latur News –  मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील 39 मार्गांवरील वाहतूक प्रभावित

लातूरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (२७ ऑगस्ट) रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुलावरून, रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील जवळपास ३९ रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे.

रस्ते अथवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहनासह किंवा स्वतः पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत करण्यात आले आहे. प्रभावित झालेल्या रस्त्यांमध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे.

माणकेश्वर, बोटकुळ, अतनूर यासह उदगीर बाराळी रस्ता बंद आहे. उटी व अलमला रस्त्यावर पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. बैठना येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे. एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे तसेच धडकनाळ बोरगाव मार्गावरही पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर ते देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल
नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, सुप्रिया सुळे यांची टीका
काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानात आगीची शंका, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
Sindhudurg News – जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यावर दगड मारला, वडील आणि भावावर कोयता उगारला
रत्नागिरी तिहेरी हत्याकांड प्रकरण, दुर्वास पाटीलसह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले
छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा