Ratnagiri News – कर्जबाजारीपणामुळे आईची हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, रत्नागिरीत खळबळ

Ratnagiri News – कर्जबाजारीपणामुळे आईची हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, रत्नागिरीत खळबळ

कर्जबाजारीपणाला कंटाळून आईची हत्या करून मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीत घडली. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पूजा शशिकांत तेली (45) आणि अनिकेत तेली (25) अशी मायलेकाची नावे आहेत.

नाचणे गावातील शांतीनगर येथे अनिकेत आई-वडिलांसह राहत होता. अनिकेतच्या वडिलांनी कर्ज काढले होते. हा कर्जाचा बोजा वाढत गेल्याने अनिकेतच्या वडिलांनी दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. वडिलांच्या निधनानंतर सर्व कर्जदार पैशांसाठी वारंवार अनिकेतकडे तगादा लावत होते.

अखेर याला कंटाळून अनिकेतने मंगळवारी पहाटेच्या सुमारास आईच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर अनिकेतने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवाभाऊ सोलापूरच्या घटनेवरून अजितदादांवर नाराज, अंजना कृष्णा प्रकरणाचा मागवला अहवाल देवाभाऊ सोलापूरच्या घटनेवरून अजितदादांवर नाराज, अंजना कृष्णा प्रकरणाचा मागवला अहवाल
सोलापूरमध्ये अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दम भरला. या घटनेचा...
प्रज्ञा सिंह यांच्यासह सात जणांच्या सुटकेला आव्हान
 दहिसर टोलनाका आता वर्सोवा पुलासमोर
’शेवग्याच्या शेंगा’ पुन्हा रंगभूमीवर, गजेंद्र अहिरे करणार दिग्दर्शन
साहित्य संघाच्या निवडणुकीत मतचोरीचा आरोप,  ‘ऊर्जा’ आणि ‘डॉ. भालेराव विचार मंच’ पॅनेल आमनेसामने
उरणमधील आगीचा मुंबईतील गॅस पुरवठ्यावर परिणाम, लाखो वाहनचालकांना फटका बसण्याची शक्यता
कांद्याच्या कोसळत्या भावाचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद