चंद्राबाबू नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; 30 विद्यमान CM च्या एकूण संपत्तीपैकी 57 टक्के एकट्या नायडूंकडे; ममता यांच्याकडे फक्त 15 लाख रुपये

चंद्राबाबू नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; 30 विद्यमान CM च्या एकूण संपत्तीपैकी 57 टक्के एकट्या नायडूंकडे; ममता यांच्याकडे फक्त 15 लाख रुपये

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे ९३१ कोटी रुपयांहून अधिक संपत्तीसह हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केवळ १५ लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. २७ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत लढण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून ही माहिती घेण्यात आली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री:

  • एन. चंद्राबाबू नायडू (आंध्र प्रदेश): ९३१ कोटी रुपये
  • पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश): ३३२ कोटी रुपये
  • सिद्धरामय्या (कर्नाटक): ५१ कोटी रुपये
  • नेफ्यू रियो (नागालँड): ४६ कोटी रुपये
  • मोहन यादव (मध्य प्रदेश): ४२ कोटी रुपये

सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री

  • ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल): १५ लाख रुपये
  • उमर अब्दुल्ला (जम्मू आणि काश्मीर): ५५ लाख रुपये
  • पिनाराई विजयन (केरळ): १.१८ कोटी रुपये
  • भजनलाल शर्मा (राजस्थान): १ कोटी रुपये
  • योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) १.५४ कोटी रुपये
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट