जेवणात विष कालवून मी 2800 कुत्र्यांना मारलंय, जेडीएसच्या नेत्याचा धक्कादायक दावा

जेवणात विष कालवून मी 2800 कुत्र्यांना मारलंय, जेडीएसच्या नेत्याचा धक्कादायक दावा

कर्नाटकमधील जनता दल सेक्युलरचे आमदार एसएल भोजेगौडा यांनी भटक्या कुत्र्यांबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे. ”चिकमंगळुरच्या पालिकेत जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा आम्ही जेवणात विष कालवून 2800 भटक्या कुत्र्यांना मारले होते. त्यानंतर त्या कुत्र्यांना नारळांच्या बागेत पुरले होते”, असे भोजेगौडा यांनी कर्नाटकच्या विधान परिषदेत सांगितले.

”भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना विशेष करून लहान मुलांना खूप त्रास होतो. आमदार, मंत्र्यांची मुलं कारमधून प्रवास करतात पण सामान्य नागरिकांची मुलं रस्त्यावरून प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेचा कधी विचार केला आहे का? रस्त्यावरून चालणारे भटक्या कुत्र्यांचा कसा सामना करत असतील. आम्हालाही प्राण्यांबाबत दया वाटते. पण प्राणी प्रेमी हे विचित्र असतात. जेव्हा तुम्ही या प्राण्यांमुळे एखाद्या लहान मुलाला त्रास होताने बघता. त्याबाबत दररोज वाचता तेव्हा वाईट वाटतं. हल्ली हे सतत बघायला मिळतंय. चिकमंगळुरच्या पालिकेत जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा आम्ही जेवणात विष कालवून 2800 भटक्या कुत्र्यांना मारले होते. त्यानंतर त्या कुत्र्यांना नारळांच्या बागेत पुरले होते. त्यासाठी आता मला तुरुंगात जरी जावे लागले तरी ठीक’, असे भोजेगौडा म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल