केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?

केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श मानलं जातं. परंतु, केळा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का? या प्रश्नावर आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोघांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. चला जाणून घेऊया, नेमकं कोणता नियम पाळावा आणि काय करावं टाळावं.

आयुर्वेद काय सांगतो?

आयुर्वेदानुसार, केळं हे थंड प्रकृतीचं फळ मानलं जातं. यामुळे शरीराला थोडी शितलता मिळते. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन C यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. पण त्याचबरोबर, त्याचे थंड गुणधर्म पचनक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार, केळा खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणं टाळावं, कारण यामुळे पचन क्रिया मंद होऊ शकते आणि खालील त्रास उद्भवू शकतात:

1. पोटात गॅस होणं

2. अपचन होणं

3. घशात खवखव

4. सर्दी किंवा खोकला वाढणं

विशेषतः थंडीच्या दिवसात किंवा जेव्हा एखाद्याला आधीपासूनच पचनाचा त्रास असेल, अशा वेळी हा प्रकार अधिक नुकसानदायक ठरू शकतो.

पाणी प्यायचंच असेल तर काय करावं?

जर तुम्हाला खूप तहान लागली असेल आणि पाणी पिणं टळणं शक्य नसेल, तर गुनगुणं पाणी पिणं चांगला पर्याय ठरतो. हे पाणी पचनक्रियेला मदत करतं आणि कुठल्याही प्रकारचा गॅस, ऍसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. पाणी पिण्याचा योग्य वेळ म्हणजे केळा खाल्ल्यानंतर 20–30 मिनिटांनी.

आधुनिक विज्ञानाचं मत काय आहे?

सध्याच्या विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, केळ्यानंतर पाणी पिणं तसं हानिकारक नसतं, परंतु ज्यांचं पचन नाजूक आहे किंवा ज्यांना आधीपासूनच गॅस्ट्रिक समस्यांचा त्रास आहे, त्यांनी थोडा संयम ठेवलेला चांगला. काही डॉक्टर यावर हेही सांगतात की, पाचक तंत्र व्यवस्थित काम करावं यासाठी एखादा वेळ द्यावा, म्हणजे केळ्याचे पोषण घटक व्यवस्थितपणे शरीरात शोषले जातील.

केळा खाण्याचे फायदे

1. पचनतंत्र सुधारतं

2. हाडं मजबूत होतात

3. हृदयासाठी फायदेशीर

4. रक्तदाब नियंत्रणात राहतो

5. स्नायूंच्या वेदना कमी होतात

6. लगेच ऊर्जा मिळते

वर्कआउटच्या आधी किंवा सकाळच्या नाश्त्यात केळा खाल्ल्यास शरीराला आवश्यक एनर्जी मिळते, म्हणूनच अनेक आहारतज्ज्ञ याची शिफारस करतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;