केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?

केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श मानलं जातं. परंतु, केळा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का? या प्रश्नावर आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोघांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. चला जाणून घेऊया, नेमकं कोणता नियम पाळावा आणि काय करावं टाळावं.

आयुर्वेद काय सांगतो?

आयुर्वेदानुसार, केळं हे थंड प्रकृतीचं फळ मानलं जातं. यामुळे शरीराला थोडी शितलता मिळते. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन C यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. पण त्याचबरोबर, त्याचे थंड गुणधर्म पचनक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार, केळा खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणं टाळावं, कारण यामुळे पचन क्रिया मंद होऊ शकते आणि खालील त्रास उद्भवू शकतात:

1. पोटात गॅस होणं

2. अपचन होणं

3. घशात खवखव

4. सर्दी किंवा खोकला वाढणं

विशेषतः थंडीच्या दिवसात किंवा जेव्हा एखाद्याला आधीपासूनच पचनाचा त्रास असेल, अशा वेळी हा प्रकार अधिक नुकसानदायक ठरू शकतो.

पाणी प्यायचंच असेल तर काय करावं?

जर तुम्हाला खूप तहान लागली असेल आणि पाणी पिणं टळणं शक्य नसेल, तर गुनगुणं पाणी पिणं चांगला पर्याय ठरतो. हे पाणी पचनक्रियेला मदत करतं आणि कुठल्याही प्रकारचा गॅस, ऍसिडिटी किंवा पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. पाणी पिण्याचा योग्य वेळ म्हणजे केळा खाल्ल्यानंतर 20–30 मिनिटांनी.

आधुनिक विज्ञानाचं मत काय आहे?

सध्याच्या विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, केळ्यानंतर पाणी पिणं तसं हानिकारक नसतं, परंतु ज्यांचं पचन नाजूक आहे किंवा ज्यांना आधीपासूनच गॅस्ट्रिक समस्यांचा त्रास आहे, त्यांनी थोडा संयम ठेवलेला चांगला. काही डॉक्टर यावर हेही सांगतात की, पाचक तंत्र व्यवस्थित काम करावं यासाठी एखादा वेळ द्यावा, म्हणजे केळ्याचे पोषण घटक व्यवस्थितपणे शरीरात शोषले जातील.

केळा खाण्याचे फायदे

1. पचनतंत्र सुधारतं

2. हाडं मजबूत होतात

3. हृदयासाठी फायदेशीर

4. रक्तदाब नियंत्रणात राहतो

5. स्नायूंच्या वेदना कमी होतात

6. लगेच ऊर्जा मिळते

वर्कआउटच्या आधी किंवा सकाळच्या नाश्त्यात केळा खाल्ल्यास शरीराला आवश्यक एनर्जी मिळते, म्हणूनच अनेक आहारतज्ज्ञ याची शिफारस करतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान