पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे!
‘जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो’. पंच्याहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असा संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता, याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढली. मोहन भागवतांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
‘मोरोपंत पिंगळे, आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवतांनी ही आठवण सांगितली. मात्र, हा सूचक इशारा कोणासाठी आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List