पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कधी पकडणार? काँग्रेसने केंद्र सरकारला विचारले 5 महत्त्वाचे प्रश्न

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कधी पकडणार? काँग्रेसने केंद्र सरकारला विचारले 5 महत्त्वाचे प्रश्न

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारला सवाल विचारला आहे की, कोणाच्या दबावाखाली शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली? पहलगाममध्ये पती गमावलेल्या महिलांना न्याय मिळाला का? खेरा यांनी विचारले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कधी पकडले जातील?

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना पुलवामा हल्ल्यात वापरल्या गेलेल्या आरडीएक्सबाबतही केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कधी पकडले जाईल, पुलवामामध्ये आरडीएक्स कोणी आणले? हाफिज सईद, अझहर मसूद आणि दाऊद इब्राहिम यांना परत आणण्यासाठी तुम्ही शस्त्रसंधी करताना अट घातली होती की नाही? याशिवाय पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीच्या अटी काय होत्या? असा प्रश्नही त्यांनी केंद्राला विचारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल