India Pakistan Tension: बिग बींपासून शाहरुख – सलमान पर्यंत साधलं मौन, लोकांचा संताप

India Pakistan Tension: बिग बींपासून शाहरुख – सलमान पर्यंत साधलं मौन, लोकांचा संताप

India Pakistan Tension: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटरवर काहीही लिहिलेलं नाही. गेल्या 15 दिवसांपासून बिग बी ब्लँक ट्विट पोस्ट करत आहे. ज्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. तर दुसरीकडे अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी देखील ‘ऑपरेशन सिंदूर’वर एकही पोस्ट केलेली नाही. कायम सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शाहरुख, सलमान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर मौन साधल्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

 

 

 

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याबाबत शाहरुख खानने अद्याप सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ज्यामुळे सोशल मीडियावर किंग खानवर जोरदार टीका होत आहे. त्याच वेळी, काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी शाहरुख खानचं मौन बाळगल्याबद्दल कौतुक केलं आहे.

एक पाकिस्तानी नेटकरी म्हणाला, ‘तुमच्यासाठी मनात प्रचंड सन्मान आहे. कारण या राजकारणात तू नाहीस. पाकिस्तानी चाहते तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात.’ अन्य एक भारतीय नेटकरी म्हणाला, ‘पहलगाम आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल तुझ्याकडून मौन अपेक्षित नव्हते.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘राहतात भारतात मन मात्र पाकिस्तानात…’

अभिनेता सलमान खान याच्यावर देखील टीका केली आहेच. सलमान खान याने पहलगान येथे झालेल्या हल्ल्यानंतर ट्विट केलं होतं. पण अभिनेत्याने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मौन बाळगलं आहे. यावर एक भारतीय नेटकरी म्हणाला, ‘हिंमत असेल तर पाकिस्तानच्या विरोधात बोलून दाखल…’ असं देखील नेटकरी म्हणाले आहेत.

‘या’ सेलिब्रिटींनी बाळगलं आहे मौन

इतर अनेक स्टार्सनीही ऑपरेशन सिंदूरवर मौन बाळगलं आहे. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या लिस्टमध्ये प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अली फजल, सैफ अली खान, करीना कपूर खान, संजय दत्त, जॅकलीन फर्नांडीज, नुसरत भरुचा यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा 2030 पर्यंत माणूस खरच अमर होणार? काय आहे गूगलच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा
गूगलचे माजी शास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध भविष्यवक्ता रे कुर्जवील यांनी सनसनाटी दावा केला आहे. 2030 पर्यंत नैनोरोबोट्सच्या मदतीने माणूस अमर होईल,...
छगन भुजबळ मंगळवारी घेणार मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खात्याची मिळणार जबाबदारी?
IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने केला पराभव
‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी
Latur News – लातूर बार्शी रोडवर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 3 ठार; 3 गंभीर जखमी
India Tour of England – टीम इंडियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडू सज्ज, दारू सोडल्याची केली मोठी घोषणा