प्रचंड यशानंतरही, पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुन ‘डाउन टू अर्थ’; कारण जाणून तुम्हालाही हेवा वाटेल

प्रचंड यशानंतरही, पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुन ‘डाउन टू अर्थ’; कारण जाणून तुम्हालाही हेवा वाटेल

साउथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जून म्हणजे सध्या प्रत्येकाच्या मनात घर केलेला ‘पुष्पा’. पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुनचे प्रत्येक पात्र त्याच्या अ‍ॅटिट्यूडसाठी ओळखले जाते. ‘ झुकेगा नाही साला,’ सारख्या आयकॉनिक डायलॉग्जने त्याला एक सुपरस्टार बनवलं आहे. एवढंच नाही तर त्याची पुष्पाची ती स्टाईलही सर्वांना पाठ आहे. या संवादाचे श्रेय त्याने त्याच्या दिग्दर्शक सुकुमारला दिले आहे. पण पडद्यावर पुष्पाची भूमिका उत्तमरित्या साकारणारा आणि आपल्या विरोधकांना आणि शत्रूंना मारणारा अभिनेता, त्याच्या खऱ्या आयुष्यातही खरोखरच असाच स्वभाव बाळगतो का? याबद्दल उत्तर जाणून घ्यायला नक्कीच प्रत्यक चाहत्याला आवडेलच.

मोठ्या यशानंतर अल्लू अर्जूनच्या स्वभावात अहंकार?

‘पुष्पा’च्या प्रचंड यशानंतर अल्लू अर्जुनची कीर्ती नवीन उंचीवर पोहोचली. कोणत्याही स्टारला आपलं असं स्टार्डम पाहून नक्कीच अभिमान आणि त्याला कदाचित अहंकाराची झाल्लर येऊच शकते. पण अल्लू अर्जूनच्या स्वभावात अहंकाराचा अंशही दिसला नाही. प्रत्येकाचा पाठिंबा आणि प्रत्येकासाठी आदर… ही त्याची ओळख आहे. वेव्हज समिट 2025 मध्ये त्याने ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे दिली त्यावरून खऱ्या आयु्ष्यातही तो हीरो ठरला.

अल्लू अर्जुनच्या व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू

टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांच्याशी झालेल्या एका खास मुलाखतीदरम्यान, अल्लू अर्जुनच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समोर आले आहेत. जेव्हा त्याला विचारण्यात आले की दहाव्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अपघात झाला, तेव्हा तो त्या संकटातून कसा सावरला? तो म्हणाला की हा माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. तो माझ्या आयुष्यातील खूप भयानक क्षण होता. पण प्रेक्षकांच्या प्रार्थनेमुळे मी पुन्हा त्यांच्यामध्ये येऊ शकलो.

प्रेक्षकांचे प्रेम हे त्याच्यासाठी मोठे वरदान 

पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला की प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच तो 69 वर्षांत राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा पहिला तेलुगू अभिनेता बनला. तो म्हणाला की “कदाचित त्या अपघाताने माझ्या आयुष्यात एक भेट आणली असेल. जर अपघात झाला नसता तर मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नसता.” यासोबतच, त्याने त्याच्या आरोग्याचे आणि यशाचे सर्व श्रेय त्याच्या चाहत्यांना दिले. प्रेक्षकांचे प्रेम हे त्याच्यासाठी मोठे वरदान असल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्य जनतेचे योगदान खूप महत्वाचे आहे

यावेळी अल्लू अर्जुनने सामान्य लोकांचे योगदान खूप महत्वाचे असल्याचेही सांगितले. तो म्हणाला की “मी माझ्या आयुष्यात एक खास मंत्र स्वीकारला आहे आणि तो म्हणजे चांगला सल्ला लहान असो किंवा मोठा, कोणाकडूनही मिळू शकतो. प्रत्येकाच्या सल्ल्याचं स्वागत करायला हवं. विश्वास ठेवावा की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे पण आपण सल्ल्याचा नक्कीच विचार करू शकतो.”

तो पुढे म्हणाला की “सेटवर चांगला सल्ला कोणाकडूनही येऊ शकतो – तंत्रज्ञ, हलका मुलगा, पोशाख डिझायनर किंवा कोरिओग्राफर. आपला विश्वास असा आहे की आपण कोणाचीही अवहेलना करू नये. तुम्हाला जे करायचे ते करा, पण सर्वांचे ऐका.”

‘मी ‘सेल्फ मेड’ अभिनेता नाही…’

अल्लू अर्जुन म्हणाला की, “माझ्या आयुष्यात मला अनेक लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत. खरंच, आपलं कुटुंब ही आपली सर्वात मोठी ओळख आहे. माझ्या आजोबांनी हजार चित्रपटांमध्ये काम केले आहे, माझ्या वडिलांनी 60 ते 70 चित्रपट बनवले आहेत आणि माझे काका एक मेगास्टार आहेत, पण मी ‘सेल्फ मेड’ अभिनेता नाही. मला घडवण्यात अनेकांचे योगदान आहे. मी त्या सर्वांचा आभारी आहे. मी एक अभिनेता आहे जो मी सर्वांच्या मदतीने बनवला आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की “मी खूप भाग्यवान आहे की मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला पण भविष्यात मला माझ्या दिग्दर्शकाची, माझ्या प्रेक्षकाची, माझ्या निर्मात्याची, तंत्रज्ञांची, कुटुंबातील सदस्यांची, चाहत्यांची मदत घ्यायची आहे, त्यांच्याशिवाय माझ्या स्टारडमला काही अर्थ नाही.” असं म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल