जलजीवन योजना सपशेल फेल, नरहरी झिरवाळ यांची कबूली

जलजीवन योजना सपशेल फेल, नरहरी झिरवाळ यांची कबूली

प्रत्येक घरात नळाने शुद्ध पाणी देण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेली ‘जलजीवन मिशन’ योजना ही महाराष्ट्रात सपशेल फेल झाल्याची कबूली महायुती सरकारमधील मंत्र्यानेच दिली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी पत्रकारांशी बोलताना या योजनेचे वाभाडे काढले आहेत. केंद्र सरकारने ही योजना योग्य प्रकारे राबवली नसल्याचे त्यांनी सांगितले.

”मी हे मान्य करतो की आताच्या घडीला जनजीवन ही फेल योजना आहे. केंद्र सरकारने सुद्धा मान्य केले आहे की ही योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आहे’, असे झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खूश आहेत – नरहरी झिरवळ

सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता महायुती सरकारमधील मंत्र्यानेच पलटी मारली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे कुणीच म्हटले नाही, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये परिपूर्ण आहेत आणि त्या दीड हजारांमध्येच खूश आहेत, असे वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कायदा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू कायदा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
कोइंबतूर येथील अमृता विश्वविद्यापीठाअंतर्गत अमृता इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ या संस्थेने 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी बी.ए., एल.एल.बी. आणि बी.बी.ए., एल.एल.बी. या...
जम्मूत तणावपूर्ण शांतता
शहीद जवान दीपक चिंगाखम यांचे वडील म्हणाले; मुलाचा अभिमान
कराची बेकरीची तोडफोड
सीमावर्ती जिह्यांत शाळा बंद राहणार
नागपूरमध्ये खदाणीत पडून पाच जणांचा मृत्यू
ड्रोन उडवल्याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल