देशाला मूर्ख बनवू नका, पाकिस्तानचं पाणी बंद करणं खरंच शक्य आहे का? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

देशाला मूर्ख बनवू नका, पाकिस्तानचं पाणी बंद करणं खरंच शक्य आहे का? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी थेट कारवाई करा असे आवाहन जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. तसेच सरकारने पाकिस्तानचे पाणी बंद करणार अशी धमकी देण्यात काही अर्थ नाही हे खरंच शक्य आहे का असा सवालही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विचारला.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, पहलगाममध्ये हिंदुवर झालेला हल्ला हा विचारपूर्वक होता. धर्म विचारून लोकांना मारलं हे क्रूरता आहे. दहशतवाद्यांनी सरळ सरळ युद्धासाठी चिथावणी दिली आहे. सरकारने याचा निषेध नव्हे तर धडक कारवाई करायला हवी, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

तसेच सिंधू नदी करार तोडून सरकार जनतेला मुर्ख नाही बनवू शकत. ज्यांनी दहशतवादी हल्ला केला आधी त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. त्यानंतर सीमेपलीकडे बसलेल्या आकांना धडा शिकवण्यासाठी सरकारने युद्धाची तयारी केली पाहिजे. देशाची जनता सरकारसोबत आहे. सरकारकडून सतत पाकिस्तानचे पाणी बंद केले जाईल अशी धमकी दिली जात आहे. पण हे खरंच शक्य आहे का? पाणी बंद करण्याच्या धमकीमुळे दहशतवाद संपणार नाही. थेट कारवाई करावी अशी मागणीही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप
हिंदुस्थान आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या काही तासातच पाकिस्तान पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार व ड्रोन हल्ले केले आहेत. जम्मू काश्मीर...
India Pakistan Ceasefire : पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की नाही? युद्धविरामानंतर काँग्रेसचा सवाल
India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!
India Pakistan Ceasefire : संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम – आदित्य ठाकरे
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार