India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!

India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांच्या सहमतीनंतर हिंदुस्थानच्या सैन्याची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत हिंदुस्थानच्या सैन्याने पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडत खरा चेहरा जगासमोर आणला. हिंदुस्थानच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला केल्याचा खोटा दावा पाकने केला होता. हा दावा हिंदुस्थानने पूर्णपणे फेटाळून लावला. पाकिस्तानचे दावे म्हणजे अपप्रचार आहेत. आणि हिंदुस्थानची कृती संयमित आणि संतुलित आहे, असे सांगत सैन्याने पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडला.

ऑपरेशन बन्यान-अल-मारसूस अंतर्गत हिंदुस्थानच्या हवाई दलाचे हवाई तळ, S-400 प्रणाली, वीजपुरवठा आणि सायबर पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. हा दावा हिंदुस्थानच्या सैन्याने पत्रकार परिषदेत स्पष्टपणे फेटाळून लावला. हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि अपप्रचार आहे. देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका पोहोचलेला नाही, असे हिंदुस्थानच्या सैन्याने स्पष्ट केले.

India Pakistan Ceasefire : दोन्ही देशांमध्ये समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती – संरक्षण मंत्रालय

पाकिस्तानचे 5 खोटे दावे, हिंदुस्थानच्या सैन्याने सांगितले सत्य

1 – सूरतगड, सिरसा आणि उधमपूर येथील S-400 रडार तळासह कोणत्याही लष्करी किंवा नागरी पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान झाले नाही, असे सांगत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पाकिस्तानचे दावे फेटाळून लावले.

2 – पाकिस्तानने केलेल्या बहुतेक घोषणा चुकीच्या माहितीवर, खोट्या आणि अपप्रचारावर आधारित आहेत. हिंदुस्थानने फक्त प्रत्युत्तर दिले आहे. आणि ते संयमित आणि केवळ सैन्य तळांवर लक्ष्य केंद्रीत होते, असे परराष्ट्र सचिव मिसरी म्हणाले.

3 – JF 17 ने हिंदुस्थानच्या S-400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळाचे नुकसान केल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे निराधार आणि खोटा आहे, असे कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या. हिंदुस्थानचे हवाई तळ आणि ब्रह्मोस प्रणाली नष्ट केल्याचा चुकीचा प्रचार पाकिस्तानने केला, असे हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.

India Pakistan Ceasefire – हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला, परराष्ट्र मंत्रालयाची शस्त्रसंधीची घोषणा

4 – पठाणकोट, भटिंडा, नालिया, सिरसा, जम्मू आणि भूज येथील हिंदुस्थानच्या हवाई दलाच्या तळांचे मोठे नुकसान झाल्याची चुकीची माहिती पाकिस्तानने पसरवली. व्यास आणि चंदीगडमधील आपल्या दारूगोळा डेपोचे नुकसान झाल्याची खोटी माहितीही पाकने पसरवली, असेही त्यांनी सांगितले.

5 – धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याच्या आरोपही हिंदुस्थानच्या सैन्याने पूर्णपणे फेटाळून लावले. हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपले सैन्य संविधानाच्या मूल्यांचा पूर्णपणे आदर करते. आम्ही कोणत्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य केले नाही, असे कर्नल कुरेशी म्हणाल्या. पाकिस्तानने केलेली घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने मुरीद, रफीकी, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान हवाई तळांसह अनेक पाकिस्तानी ठिकाणांवर अचूक हल्ले केले, असे सैन्याकडून सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आम्ही युद्धाच्या पक्षात नाही! NSA अजित डोवाल यांनी चीनच्या वांग यी यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही युद्धाच्या पक्षात नाही! NSA अजित डोवाल यांनी चीनच्या वांग यी यांना स्पष्ट शब्दात सांगितलं
    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून संवाद साधला की ‘हिंदुस्थान युद्धाच्या पक्षात
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, हिंदुस्थानी सैन्याला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; देशभरात संतापाची लाट
विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप
India Pakistan Ceasefire : पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की नाही? युद्धविरामानंतर काँग्रेसचा सवाल
India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!
India Pakistan Ceasefire : संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम – आदित्य ठाकरे