मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी

मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडजीवळ बसचा एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 8 वर्षांच्या मुलीने जीव गमावला आहे. तर या अपघातात 10-12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिवंडीजवळील पडघा गावाजवळ हा अपघात घडला आहे. पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने हा घाला घातला असून 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. अपघाताचे वृत्त समजाताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळू धाव घेत मदकार्य सुरू केलं. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील पडघा वडपे गावाजवळ अपघात घडला. बसचालक अतीवेगात असल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली. आणि मोठा अपघात झाला. अपघातावेळी बसमध्ये 20 प्रवास होते. भिवंडीतील काही कुटुंबीय खडवली येथे पिकनिकसाठी गेले होते. मात्र परत येताना रात्री त्यांच्या बसला अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 10 ते 12 जण जखमी झाले. तर 8 वर्षांची मुलगी मृत्यूमुखी पडली.

या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी तातडीने भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी तिघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे देखील रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी जखमींची विचारपूस केल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप
हिंदुस्थान आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या काही तासातच पाकिस्तान पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार व ड्रोन हल्ले केले आहेत. जम्मू काश्मीर...
India Pakistan Ceasefire : पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की नाही? युद्धविरामानंतर काँग्रेसचा सवाल
India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!
India Pakistan Ceasefire : संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम – आदित्य ठाकरे
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार