सावधान…! उष्णतेच्या लाटांचा पुन्हा तडाखा, विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत अघोषित संचारबंदी

सावधान…! उष्णतेच्या लाटांचा पुन्हा तडाखा, विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत अघोषित संचारबंदी

विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकल्या आहेत. राज्यभरात सर्वत्रच उच्चांकी तापमान नोंदवले जात आहे. त्यामुळे नागरिकांना भर दुपारी घराबाहेर पडणे नकोसे झाले असून अनेक भागांत अघोषित संचारबंदीचे चित्र दिसत आहे. सकाळी 10 नंतर रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही तापमानात मोठी वाढ झाली असून उन्हात चालताना मुंबईकरांची प्रचंड दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीचे काम असेल तरच दुपारी घराबाहेर पडा, असा सल्ला डॉक्टर तसेच हवामानतज्ञांनी दिला आहे.

हवामान खात्याने विदर्भात गुरुवारपर्यंत उष्णतेच्या लाटा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत असल्याने राज्यात उष्णतेची लाट धडकली आहे. ग्रामीण भागाप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नवी मुंबई या शहरी भागांत उष्णतेची तीव्रता वाढली आहे. मुंबई व परिसरात पुढील आठवडाभर कमाल तापमान 34 ते 35 अंशांच्या आसपास, तर किमान तापमान 24 ते 26 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

उच्चांकी तापमानामुळे नागरिकांना भर दुपारी घराबाहेर पडणे नकोसे झाले आहे. त्यामुळे विदर्भासह राज्याच्या अनेक भागांमध्ये दिवसा अघोषित संचारबंदीचे चित्र दिसत आहे. सकाळी 10 नंतर रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे.

हवामान खात्याने महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यांत मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.

 चंद्रपूर सर्वाधिक उष्णतापमान 46 अंशांवर

राज्यात चंद्रपूर सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे. सोमवारी चंद्रपूरचे तापमान 46 अंशांवर गेले. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी – 45 अंश, अमरावती – 44.6 व अकोला येथे 44.1 अंश तापमान नोंद झाले. मंगळवारीही 45 ते 46 अंशांवर पारा होता. 24 एप्रिलपर्यंत हीच होरपळ असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल