मृत मित्राच्या आठवणीत बनवला लाइटवाले हेल्मेट 

मृत मित्राच्या आठवणीत बनवला लाइटवाले हेल्मेट 

रितेश कोचेता हा क्रूझर नावाच्या कंपनीचा संस्थापक. आपल्या मित्राला अपघातात गमावल्यानंतर रितेशने लाइटवाले हेल्मेट बनवण्याचा निर्णय घेतला. त्याने बनवलेल्या हेल्मेटमध्ये लाल रंगाचे लुकलुकणारे दिवे आहेत. ‘2010 मध्ये हेल्मेटअभावी मित्राचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे खूप नैराश्य आले. त्याला ज्या ट्रकने उडवले त्या ट्रक चालकाने रात्रीच्या अंधारात काहीच दिसले नसल्याचे कारण दिले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात लुकलुकणारे हेल्मेट बनवण्याची कल्पना सुचली’, असे रितेश सांगतो. त्याची आता वार्षिक उलाढाल 1.5 कोटींच्या घरात आहे. रितेशने मित्राच्या मृत्यूनंतर अशी उत्पादने बनवण्याचा विचार केला. रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या वाहनांना आपण दिसलो तरच आपला जीव वाचू शकतो. मी सर्वप्रथम खांद्यावर घालण्यायोग्य एक उपकरण बनवले होते. त्यात दिवे बसवले होते. कोणी रात्री गाडी चालवताना ते घातले तर त्याच्या मागे असलेली व्यक्ती अंधारातही त्याला पाहू शकते, असे रितेशने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’
“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा
पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात