तेलंगणात एससी आरक्षणाचे विभाजन, असा निर्णय घेणारे ठरले पहिले राज्य

तेलंगणात एससी आरक्षणाचे विभाजन, असा निर्णय घेणारे ठरले पहिले राज्य

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेलंगणा सरकारने आज एससी अर्थात अनुसूचित जाती आरक्षणात बदल करणारा आदेश जारी केला. त्यानुसार अनुसूचित जातींचे तीन गटात विभाजन करण्यात आले आहे. असे करणारे तेलंगणा हे पहिले राज्य बनले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

तेलंगणा सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता. आयोगाने अनुसूचित जातींच्या 59 जातींना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात एकूण 15 टक्के आरक्षण देण्यासाठी तीन श्रेणींमध्ये विभागण्याची शिफारस केली. हा कायदा लागू करण्यापूर्वी रविवारी सचिवालयात अंतिम मंत्रिमंडळ बैठक झाली, अशी माहिती रेड्डी यांनी दिली. दरम्यान, गट 1 मध्ये एक टक्का आरक्षण 15 सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित अनुसूचित जातींना दिले आहे. तर गट 2 अंतर्गत 18 अनुसूचित जातींना 9 टक्के आरक्षण आणि गट 3 अंतर्गत 26 अनुसूचित जातींना 5 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी...
“कसलाच पश्चात्ताप नाही..”; अमृताला कानाखाली वाजवल्याप्रकरणी अखेर ईशाने सोडलं मौन
मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…
साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू
पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले
भीमा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू; गढूळ पाण्यामुळे बठाण, उचेठाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर