सलमान-अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप होतायत? श्रेयसने सांगितलं खरं कारण

सलमान-अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप होतायत? श्रेयसने सांगितलं खरं कारण

गेल्या काही वर्षांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठमोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट दणक्यात आपटले. सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या सेलिब्रिटींच्या चित्रपटांनाही नुकसान सोसावं लागलं. सलमानचे ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ तर अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रामसेतू’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे चित्रपट फ्लॉप ठरले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता श्रेयस तळपदेनं यावर आपलं मत मांडलं आहे. सुपरस्टार्सच्या चाहत्यांची आवड दिवसेंदिवस बदलतेय आणि त्यांना तोच-तोचपणा नकोय, असं त्याने म्हटलंय.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला, “लोक आता थकले आहेत. ते ट्रेलर पाहूनच ओळखतात की चित्रपट कसा असेल. ट्रेलर पाहूनच ते ठरवतात की हा चित्रपट थिएटरमध्ये पहायचा की नाही. आम्ही कितीही प्रमोट केलं तरी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणारा प्रेक्षक हा ट्रेलर बघूनच त्याचा निर्णय घेतो की चित्रपट बघायचा की नाही, कधी बघायचा किंवा लोकांच्या प्रतिक्रियांनंतर बघायचा का?” त्याचप्रमाणे केवळ एखाद्या ठराविक स्टारमुळे चित्रपटाला यश मिळतंच असं नाही, हे त्याने स्पष्ट केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

“स्टार पॉवर खरंच असेल तर त्यांचे सर्व चित्रपट चालले पाहिजेत. राजेश खन्ना यांचे चित्रपट एका रांगेत हिट ठरले होते. पण एका वेळेनंतर त्यांच्या चित्रपटांना तितका प्रतिसाद मिळत नव्हता. हे आधीपासूनच होत आलंय आणि पुढेही असंच होणार. त्यामुळे आमचं काम इतकंच आहे की चांगले चित्रपट बनवत राहणं”, असं तो पुढे म्हणाला.

श्रेयस लवकरच ‘कर्तम भुगतम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत विजय राज, मधू शाह आणि अक्षा पर्दासनी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 17 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी श्रेयला हृदयविकाराचा झटका आला होता. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर श्रेयसने काही काळ ब्रेक घेतला आणि आता तो पुन्हा चित्रपटांमध्ये सक्रिय झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा
मुंबई : जगात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल ज्याने आयुष्यात कधीही प्रेम केले नसेल. प्रेम हे ते वादळ आहे. जे...
उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप