एअर इंडिया एक्प्रेसच्या कर्मचाऱयांचे आंदोलन मागे; 25 कर्मचारी पुन्हा कामावर

एअर इंडिया एक्प्रेसच्या कर्मचाऱयांचे आंदोलन मागे; 25 कर्मचारी पुन्हा कामावर

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेसमधील  तब्बल 300 क्रू मेंबर्सनी पुकारलेले सामूहिक रजा आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काढून टाकलेल्या 25 कर्मचाऱयांना पुन्हा कामावर घेतले. मात्र बुधवारी सायंकाळपासून पुकारलेल्या आंदोलनामुळे विमान उड्डाणांचा आज सलग दुसऱया दिवशीही प्रचंड खोळंबा झाला. गुरुवारी तब्बल 85 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तर मंगळवारी सायंकाळपासून 170 विमान उड्डाणांवर परिणाम झाला. मुख्य कामगार आयुक्तांच्या कार्यालयात कर्मचारी संघटना आणि पंपनी व्यवस्थापनाची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेनंतर कर्मचाऱयांनी आंदोलन मागे घेतले.

तब्बल पाच तास बैठक चालली. यावेळी एअर इंडिया एक्स्प्रेस कर्मचारी संघटनेचे आणि भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सचिव गिरीश चंद्र आचार्य यांनी काढून टाकलेल्या 25 कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.

कर्मचाऱयांच्या तुटवडय़ामुळे आणखी काही दिवस प्रवाशांना त्रास सहन करावा लागेल. पंपनी विमान उड्डाणांची संख्या कमी करेल. आधीच नियोजित उड्डाणेही कमी करावी लागतील.

आलोक सिंह, सीईओ, एअर इंडिया एक्स्प्रेस

कंपनीने बजावली नोटीस

कंपनीने सर्व कर्मचाऱयांना नोटीस बजावली आहे. अशा प्रकारे अचानक सामूहिक रजा घेणे कायद्याच्या विरोधात असून या आंदोलनामुळे मोठय़ा संख्येने उड्डाणे रद्द करावी लागली. उड्डाणांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याचे पंपनीने नमूद केले आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा
मुंबई : जगात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल ज्याने आयुष्यात कधीही प्रेम केले नसेल. प्रेम हे ते वादळ आहे. जे...
उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप