तुरुंगवारी टाळण्यासाठीच केरळच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाशी समझोता केला; प्रियांका गांधी यांचा हल्ला

तुरुंगवारी टाळण्यासाठीच केरळच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाशी समझोता केला; प्रियांका गांधी यांचा हल्ला

केरळचे मुख्यमंत्री पनरई विजयन यांनी तुरुंगवारी टाळण्यासाठीच भाजपाशी समझोता केला, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत जोरदार हल्ला केला. अनेक घोटाळे बाहेर येऊनही मोदी सरकारने विजयन यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नसल्याकडे प्रियंका गांधी यांनी लक्ष वेधले.

माकपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत. परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पेंद्र सरकारने त्यांच्या विरोधात अद्याप कारवाई केलेली नसल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. केरळचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्यावर आरोप करतात, पण भाजपाविरोधात अवाक्षरही काढत नाहीत. जेव्हा कुणी योग्य व्यक्ती मैदानात उतरतो तेव्हा त्याच्याविरोधात सर्व शक्ती एकत्र येतात, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. दरम्यान, राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसकडून वायनाड येथून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान? उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळं ठाकरे बंधूंसाठी सुद्धा ही निवडणूक वेगळी ठरली. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं. तर...
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप
मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही! मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा, 4 जूनपासून उपोषणावर ठाम