पंतप्रधान कार्यालयाची 24 तास नजर, केजरीवालांसाठी तिहार तुरुंग बनला टॉर्चर रुम; ‘आप’चा गंभीर आरोप

पंतप्रधान कार्यालयाची 24 तास नजर, केजरीवालांसाठी तिहार तुरुंग बनला टॉर्चर रुम; ‘आप’चा गंभीर आरोप

आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायब राज्यपास व्ही के सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. तिहार तुरुंग अरविंद केजरीवाल यांच्यासाठी टॉर्चर रुम बनल्याचा आरोप या पत्रामध्ये सिंह यांनी केला आहे.

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली. सध्या ते तिहार तुरुंगामध्ये कैद आहेत. हे तुरुंग केजरीवाल यांच्यासाठी टॉर्चर रुम बनल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाद्वारे (पीएमओ) अरविंद केजरीवाल यांच्यावर 24 तास नजर ठेवली जात आहे. असे वाटतेय की कोणीतरी मोठा हेर केजरीवाल यांची हेरगिरी करतोय, असे सिंह यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

केजरीवाल यांना 23 दिवस इन्सुलिन देण्यात आले नाही. दिल्लीची सेवा करणे हा केजरीवाल यांचा गुन्हा आहे का? त्यांच्याशी वैयक्तीक शत्रुत्व का? विरोधी नेत्याचा जीव घेऊन तुम्ही त्यांना संपणार आहात का? असा सवाल तर पंतप्रधान कार्यालय आणि नायब राज्यपाल यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार होत आहे, याचे आपल्याला दु:ख होत असल्याचे सिंह म्हणाले.

तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये झालेल्या जीवघेण्या राड्याचाही उल्लेख सिंह यांनी पत्रामध्ये केला असून अरविंद केजरीवाल यांच्या सुरेक्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिहार तुरुंगामध्ये याआधी हत्याही झाल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. उद्या केजरीवाल यांच्यावर असा हल्ला झाला तर काय? त्यांच्या जिवाला धोका असल्याचेही सिंह म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘हा निवडणूक आयोगाचा अतिशय नीच खेळ’, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ‘हा निवडणूक आयोगाचा अतिशय नीच खेळ’, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या...
उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
‘त्या’ निवडणूक प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांची नावे शिवसेना शाखेला कळवा, उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन
आईसोबत फिरते जग, आराध्या बच्चन कधी जाते शाळेत?, ऐश्वर्या राय हिच्याकडून मोठा खुलासा, म्हणाली..
‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत सेलिब्रिटी किरण गायकवाडची एण्ट्री
मतदान न करणाऱ्यांवर भडकले परेश रावल; म्हणाले “अशा लोकांचा टॅक्स..”
‘ती’ गोष्ट लहानपणापासून मनावर कोरून ठेवलीय; मतदानानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली पोस्ट