तिच्यावर आमचा राग काढू नका..; गोविंदा-कृष्णा अभिषेकमधील वाद पुन्हा चर्चेत

तिच्यावर आमचा राग काढू नका..; गोविंदा-कृष्णा अभिषेकमधील वाद पुन्हा चर्चेत

अभिनेता गोविंदाची भाची आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सगळ्यांत कुठेच गोविंदा दिसले नाहीत. भाचा कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांच्यासोबत गोविंदा आणि त्याची पत्नीचा वाद सुरू आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांसमोर येणं टाळतात. अनेकदा सोशल मीडिया आणि मुलाखतींमध्ये कश्मीरा आणि गोविंदाच्या पत्नीने एकमेकांना टोमणे मारले. त्यामुळे आरतीच्या लग्नाला ते उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कश्मीराने उत्तर दिलं आहे. “मामाने भाचीच्या लग्नात यावं अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. ते लग्नाला आल्यास मी मनापासून त्यांचं स्वागत करेन”, असं ती म्हणाली.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरा पुढे म्हणाला, “त्यांची आमच्यावर नाराजी असू शकते पण आरतीवर त्यांचा कोणताच राग नाही. हे लग्नसुद्धा कृष्णाचं नाही. त्यामुळे ते आमच्या लग्नात आले नसते तर मी समजू शकले असते की ते आमच्यावर नाराज आहेत. पण त्यांनी लग्नाला यावं अशी आरतीची मनापासून इच्छा आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी या लग्नाला यावं. हे तिचं लग्न आहे आणि तिच्यावर त्यांनी कोणताच राग काढू नये.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Style Story 🦋 (@starstylestory)

“संपूर्ण कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू. मी त्यांची सून आहे. लग्नात आल्यास एक सून म्हणून मी त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेईन. आमच्यात जो काही वाद झाला, त्याचं आरतीशी काहीच देणं-घेणं नाही. कुटुंबात असे छोटे-मोठे वाद होत राहतात. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही”, असं तिने पुढे सांगितलं.

एका मुलाखतीत आरतीने सांगितलं होतं की गोविंदाने तिच्यासोबतही बोलणं बंद केलं आहे. “त्यांच्यात जे काही भांडण झालं, त्याचा फटका मलाही बसला आहे. चीची मामा आणि त्यांचे कुटुंबीय माझ्यासीशी बोलत नाहीत”, अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली होती. आरती सिंह ही मुंबईतील बिझनेसमन दीपक चौहानशी लग्न करतेय. या दोघांचं लग्न येत्या 25 एप्रिल रोजी आहे. 22 एप्रिल रोजी आरतीचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या मेहंदीच्या कार्यक्रमात इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी पोहोचले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था