आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसलोय, ‘हंबरडा मोर्चा’पूर्वी संजय राऊत यांची फटकेबाजी, फडणवीसांवर घणाघात

आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसलोय, ‘हंबरडा मोर्चा’पूर्वी संजय राऊत यांची फटकेबाजी, फडणवीसांवर घणाघात

अस्मानी-सुलतानी संकटाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्तालयावर शिवसेना ‘हंबरडा मोर्चा’ काढून धडक देणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार असून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसलोय. त्यामुळे तुम्हाला आमची भीती वाटतेय, असे राऊत शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारची टीका-टिप्पणी करणे हा या महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे. आजचा मोर्चा हा शेतकऱ्यांचा हंबरडा फडणवीस यांच्यासमोरच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचा यासाठी आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक, हालअपेष्टा सुरू आहे. सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटाशी मराठवाड्यातील शेतकरी सामना करत असताना पॅकेजच्या नावाखाली धुळफेक केली आहे. देवेंद्रजींनी 31 हजार कोटींचे पॅकेज आणले. पण हे पॅकेज फार तर साडे पाच ते सहा हजार कोटींचे आहे. बाकी सगळी धुळफेक आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

शिवसेनेचा मोर्चा प्रचंड होईल. आमचा आक्रोश, हंबरडा देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला तर त्याच्यावर विचार करतील. पण भाजप हा निगरगट्ट मनाचा, ठेकेदारांचा पक्ष आहे. त्यांना शेतकऱ्यांची काय चिंता आहे? असा सवालही राऊत यांनी केला.

शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी देण्यात यावी आणि कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे. या मागणीसाठी आणि मराठवाड्यातील, राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा आम्ही काढत असून आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसतोय. म्हणून तुम्हाला भीती वाटतेय, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी – हर्षवर्धन सपकाळ राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी – हर्षवर्धन सपकाळ
“भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता...
पक्ष्याच्या धडकेमुळे एअर इंडियाच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, नागपूर-दिल्ली फ्लाइट रद्द
234 मोबाईल फोनमुळे आग आणखी पसरली, करनूल बस अपघाताप्रकरणी धक्कादायक खुलासा
Mumbai News – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द तर काही 20 मिनिटे उशिराने
कागलमध्ये आकाश पाळणा ८० फुटांवर अडकला, दोन तास रेस्क्यू ऑपरेशन, १६ जणांची सुखरूप सुटका
भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या 8 जणांना चिरडले, 5 जणांचा जागीच मृत्यू; तिघांची प्रकृती चिंताजनक
कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची घोषणाबाजी