पाच लाख ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार! सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर

पाच लाख ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार! सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर

सर्वोच्च न्यायालयात अंडरट्रायल कैद्यांच्या मतदानाच्या अधिकारासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली. तसेच ट्रायल कैद्यांसाठी तुरुंगात मतदान केंद्र सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना लागू करण्यास सांगितले आहे.

याचिकाकर्त्या सुनीता वर्मा यांनी देशभरातील तुरुंगात कैद असलेल्या ट्रायल कैद्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या कायद्याला आव्हान दिले आहे. सुनीता वर्मा यांनी सुमारे पाच लाख ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी केलीय. त्यांची बाजू वकील प्रशांत भूषण यांनी मांडली. जामिनावर सुटणारे लोक मतदान करू शकतात. ट्रायल कैदी जे निर्दोष आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार का नाहीये, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या बाजूने करण्यात आला. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडे चार आठवडय़ांत उत्तर मागितले आहे.

हिंदुस्थानात जनप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 62 (5) अन्वये ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही. कायद्यानुसार, पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन कोठडीत असलेला किंवा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला मतदान करता येत नाही. मतदान हा एक कायदेशीर अधिकार आहे. कायद्याचे उल्लंघन करणारे त्याचा वापर करू शकत नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी – हर्षवर्धन सपकाळ राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव, एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी – हर्षवर्धन सपकाळ
“भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता...
पक्ष्याच्या धडकेमुळे एअर इंडियाच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, नागपूर-दिल्ली फ्लाइट रद्द
234 मोबाईल फोनमुळे आग आणखी पसरली, करनूल बस अपघाताप्रकरणी धक्कादायक खुलासा
Mumbai News – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द तर काही 20 मिनिटे उशिराने
कागलमध्ये आकाश पाळणा ८० फुटांवर अडकला, दोन तास रेस्क्यू ऑपरेशन, १६ जणांची सुखरूप सुटका
भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या 8 जणांना चिरडले, 5 जणांचा जागीच मृत्यू; तिघांची प्रकृती चिंताजनक
कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची घोषणाबाजी