काॅण्ट्रक्टरसाठीच भाजप ‘बेस्ट’ संपवतेय! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

काॅण्ट्रक्टरसाठीच भाजप ‘बेस्ट’ संपवतेय! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

खासगी काॅण्ट्रक्टरला प्रोत्साहन देऊन बेस्ट वाहतूक व्यवस्था संपवण्याचा घाट भाजप सरकारने घातल्याचा हल्ला आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. यासाठी ‘बेस्ट’ला निधी देण्याऐवजी आणि नव्या बसेस ताफ्यात घेण्याऐवजी गाड्यांचा ताफा कमी केला जात असल्याचेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून भाजप सरकारच्या ‘बेस्ट’विरोधी धोरणाची पोलखोल केली. भाजप सरकारच्या काळातच बसताफा कमी करून भाडेवाढ मात्र दुप्पट केल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईकरांचे हाल होत असताना भाजपच्या आशीर्वादामुळे खासगी कंत्राटदार मात्र नफा कमवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई मेट्रो-3ने मार्गावरील रस्ते आणि पदपथांचे काम तातडीने पूर्ण करायला हवे. मात्र शेवटच्या टप्प्यासाठी पुन्हा वाहनाची गरज भासतेय हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला. शेवटचा टप्पा चालण्यास योग्य असायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

दहा हजार इलेक्ट्रिक बस रखडल्या

महाविकास आघाडीच्या काळात बेस्टचे भाडे स्थिर आणि सर्वसामान्यांना परवडणारे ठेवण्यात आले होते. तसेच 2027 पर्यंत दहा हजार इलेक्ट्रिक बस ताफ्यात आणण्याची आमची योजना होती. मात्र भाजपने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना मुंबईची खरी लाइफलाइन संपवायची आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले...
नॉनवेज,पिझ्झा-बर्गरपेक्षादेखील हा गोड पदार्थ लिव्हरसाठी असतो सर्वात धोकादायक
माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना
लक्ष लक्ष दिव्यांनी कोकणची दक्षिण काशी उजळली ! कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा