नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांना, मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या नाही तर संघर्ष होईल, संजय राऊत यांचा इशारा

नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांना, मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या नाही तर संघर्ष होईल, संजय राऊत यांचा इशारा

नवी मुंबईतील दि बा पाटील विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे. मुंबई विमानतळावर जसे शिवसेनेने मराठी माणसाला नोकऱ्या दिल्या होत्या तसंच नवी मुंबई विमानतळावर देखील मराठी माणसाला , भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या, अन्यथा संघर्ष होईल असे संजय राऊत म्हणाले.

”नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिलं होतं. शिवसेना ही भूमिपुत्रांच्या संघर्षासाठी तयार झालेली संघटना आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील याचं नाव नवी मुंबई विमानतळाला देणं हा महाराष्ट्रातील सर्व भूमीपुत्रांचा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेल्या लढ्याचा सन्मान आहे. या कार्यात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मोठा हातभार लाभला. या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचं आम्ही स्वागत करतो. पण यासोबतच मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख पुसली जाता कामा नये. ते विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आहे. तसंच दुसरी गोष्ट मुंबई विमानतळ जेव्हा बनलं तेव्हा शिवसेनेनं तिथे भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या. तिथे भूमिपुत्रांचाच आवाज राहिला. आता नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या नावाने गरबा खेळला जाऊ नये. तिथे देखील भूमिपुत्रांना, मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या हव्या. तसं झालं नाही तर संघर्ष होईल”, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे
आरोग्याची वेळीच काळजी न घेतल्यास त्याचे भविष्यात फार गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे काही पदार्थ खातानाही विचार करायला हवा. असे...
रात्री झोपण्यापूर्वी ही एक गोष्ट करा, तुमचा सर्व थकवा नाहीसा होईल, झोपही लागेल शांत
राज्यपालांचा खाजगी एलिफंटा दौरा; उद्या गेटवे-मांडवा, गेटवे -एलिफंटा दरम्यान सागरी वाहतूक बंद
शिवरायांच्या वेशातील तरुणाला विरोध, वसई भुईकोट किल्ल्यावर जाण्यापासून परप्रांतीय सुरक्षारक्षकांनी रोखलं
मुंबईतल्या मदनपुरा भागात इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती
लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद, तरुणीने व्हिडीओ शेअर करून सांगितला घटनाक्रम