विशाखापट्टणम क्रिकेट स्टेडियमवर आता मिताली राज आणि रवि कल्पना यांच्या नावाने स्टँड झळकणार

विशाखापट्टणम क्रिकेट स्टेडियमवर आता मिताली राज आणि रवि कल्पना यांच्या नावाने स्टँड झळकणार

हिंदुस्थानी महिला संघाची दिग्गज माजी खेळाडू आणि यशस्वी कर्णधार मिताली राजच्या नावाने विशाखापट्टणम क्रिकेट स्टेडियमवरील स्टँड झळकणार आहे. त्याचबरोबर माजी यष्टीरक्षक-फलंदाज रवि कल्पानाचे नाव सुद्धा एका स्टँडला दिले जाणार आहे. या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला जाणार असून 12 ऑक्टोबर रोजी दोन्ही स्टँडचे अनावरण केले जाणार आहे. टीम इंडियाची विस्फोटक फलंदाजी स्मृती मानधनाने ही मागणी केली होती.

आंध्र क्रिकेट संघाने (ACA) मिताली राज आणि रवि कल्पना यांचे हिंदुस्थानी क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. दोघींचाही प्रवास येणाऱ्या पीढीला मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देणारा असल्याचं सुद्धा ACA ने म्हटलं आहे. दरम्यान, स्मृती मानधनाने ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘Breaking The Boundaries’ या कार्यक्रमात बोलत असताना आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांना स्टँडला नावं देण्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिच्या या मागणीचा प्रस्ताव स्विकारला आणि मंत्री नारा लोकेश यांनी आंध्र क्रिकेट असोसिएशनची चर्चा केली. त्यानंतर मिताली राज आणि रवि कल्पना यांचे नाव स्टँडला देऊन त्यांचा सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. 12 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्डकपमधील सामना विशाखापट्टणम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी स्टेडियमवरील दोन स्टँडला मिताली राज आणि रवि कल्पना यांची नावे देण्यात येणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
दिवाळी असल्याने फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर हवेची गुणवत्ता खालावली आहे. तिकडे दिल्लीचा एक्यूआय 400 च्या पुढे गेला आहे तर इतरही ठिकाणी...
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर
माभळे गावात सलग पाचवी पिढी राबवत आहे सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग, 20 कुटुंबातील 70 माणसे करत आहेत एकत्र शेती
परळची देवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे आदिवासी पाड्यात आधुनिक शैक्षणिक साहित्याचे वाटप
सकाळी पोट साफ होत नसेल तर ही गोष्ट करून बघा, वाचा
‘रुपेरी सोनसळा’… नांदेडकरांनी अनुभवला मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास
हिंदुस्थान S-400 सिस्टीमसाठी रशियासोबत करणार 10 हजार कोटींचा करार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी विमानांना पडण्यास झाली होती मदत