रायबरेलीमध्ये व्यक्ती नाही, संविधानाची हत्या झाली; तरुणाच्या झुंडबळीवरून राहुल गांधी यांची टीका

रायबरेलीमध्ये व्यक्ती नाही, संविधानाची हत्या झाली; तरुणाच्या झुंडबळीवरून राहुल गांधी यांची टीका

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात हरिओम नावाच्या एका दलित तरुणाला चोर समजून जमावाने क्रूरपणे मारहाण करून त्याला ठार मारले. यावरूनच आता लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी मोदी आणि योगी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले हवेत की, “रायबरेलीमध्ये व्यक्ती नाही तर, संविधानाची हत्या झाली आहे.” X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, “रायबरेलीत दलित तरुण हरिओम वाल्मिकीची क्रूर हत्या ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही, ती मानवतेची, संविधानाची आणि न्यायाची हत्या आहे. आज देशात दलित, आदिवासी, मुस्लिम, मागासवर्गीय आणि गरीब यांचा आवाज कमकुवत झाला आहे. त्यांचा वाटा हिरावून घेतला जात आहे आणि त्यांच्या जीवनाला किंमत उरली नाही. त्यांना लक्ष्य केलं जात आहे.”

ते म्हणाले, “या देशात द्वेष, हिंसाचार आणि जमावाला सत्तेचे आश्रयस्थान आहे. जिथे संविधानाची जागा बुलडोझरने घेतली आहे आणि न्यायाची जागा भीतीने घेतली आहे. मी हरिओमच्या कुटुंबासोबत आहे. त्यांना नक्कीच न्याय मिळेल. हिंदुस्थानचे भविष्य समानता आणि मानवतेवर अवलंबून आहे आणि हा देश जमावाच्या इच्छेनुसार नाही तर संविधानाने चालवला जाईल.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
दिवाळी असल्याने फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर हवेची गुणवत्ता खालावली आहे. तिकडे दिल्लीचा एक्यूआय 400 च्या पुढे गेला आहे तर इतरही ठिकाणी...
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर
माभळे गावात सलग पाचवी पिढी राबवत आहे सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग, 20 कुटुंबातील 70 माणसे करत आहेत एकत्र शेती
परळची देवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे आदिवासी पाड्यात आधुनिक शैक्षणिक साहित्याचे वाटप
सकाळी पोट साफ होत नसेल तर ही गोष्ट करून बघा, वाचा
‘रुपेरी सोनसळा’… नांदेडकरांनी अनुभवला मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास
हिंदुस्थान S-400 सिस्टीमसाठी रशियासोबत करणार 10 हजार कोटींचा करार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी विमानांना पडण्यास झाली होती मदत