हिरव्या मिरच्या चिरल्याने किंवा चटणी वाटल्याने हातांमध्ये जळजळ होतेय, तर हे घरगुती उपाय त्वरित आराम देतील

हिरव्या मिरच्या चिरल्याने किंवा चटणी वाटल्याने हातांमध्ये जळजळ होतेय, तर हे घरगुती उपाय त्वरित आराम देतील

हिरव्या मिरच्या केवळ पदार्थांना तिखटपणा देत नाहीत, तर पदार्थांना एक विशिष्ट चव देखील देतात, त्यासोबत ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा त्यात असलेल्या कॅप्सेसिनमुळे येतो, ज्यामुळे त्वचेवर जळजळ आणि उबदारपणा जाणवतो. देठाजवळील मिरचीचा पांढरा भाग विशेषतः जास्त तीखट असतो. हिरव्या मिरची कापल्यावर त्याचा तीखटपणा त्वचेला लागुन जळजळ होऊ शकते. यापासून आराम मिळवण्यासाठी, तुम्ही घरगुती सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता. जाणुन घ्या

दूध

तुम्हाला मिरच्यांमुळे हातावर जळजळ होत असेल तर दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे. मिरची कापल्यानंतर हात जळजळत असेल तर थंड दुधाच्या भांड्यात हात बुडवा. तिखटपणामुळे होणाऱ्या जळजळपासुन आराम मिळतो. पर्यायी म्हणून, तुम्ही दुधाची साय सुद्धा हाताला लावू शकता, यामुळे लगेच आराम मिळेल.

 

 

अ‍ॅलोवेरा

बहुतेक घरांमध्ये कोरफडचे झाड असते, जे त्वचेपासून केसांपर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते.  मिरच्यांच्या तीखटपणामुळे हाताची जळजळ होत असेल तर अ‍ॅलोवेरा जेल लावा किंवा अॅलोवेरा चे दोन भाग करुन एक भाग हातावर जळजळत्या भागावर लावा. किरकोळ भाजणे आणि जखमांवरही कोरफडचा वापर फायदेशीर आहे.

 

 

लिंबाचा रस

मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी लिंबू खूप प्रभावी आहे. मिरच्यांमुळे तुमचे हात जळत असतील तर लिंबाचा रस लावणे देखील फायदेशीर ठरू शकते.

 

 

घरात वापरले जाणारे ‘हे’ तेल मदत करतील

हिरव्या मिरच्या किंवा कोणतीही तीखट चटणी वाटल्यामुळे हाताला जळजळ होत असेल तर नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावल्याने आराम मिळू शकतो. याशिवाय, देशी तूप जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे .

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी लग्नाची पत्रिका द्यायला मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू, भाऊ किरकोळ जखमी
लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तळवडे–आंब्रड मार्गावर घडली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास...
ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 84 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ratnagiri News – परतीच्या पावसात हरभरा, पावटा, तूर पीक घेण्यास शेतकरी सरसावला; भात कापणीबरोबर केली जाते वायंगणी शेती
Jalna News – कंत्राटदाराच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, चंदनझिरा पोलिसांची कामगिरी
Nanded News – बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, 27 प्रवासी जखमी
ICC Women’s World Cup 2025 – श्रीलंकेच्या कर्णधाराची विक्रमाला गवसणी, असं करणारी पहिलीच खेळाडू
उमेदवारी अर्ज दाखल करताच RJD उमेदवाराला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?