बिहारमध्ये महिलांच्या खात्यात मोदींनी प्रत्येकी 10 हजार टाकलेत, मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बिहारमध्ये महिलांच्या खात्यात मोदींनी प्रत्येकी 10 हजार टाकलेत, मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बिहारच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील 75 लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले आहेत. तुम्हाला बिहारच्या महिला जास्त लाडक्या आहेत आणि महाराष्ट्रातील माझ्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? की, बिहारच्या महिलांची तुम्हाला मतासाठी गरज आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर जास्त प्रेम करत आहात का, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. फक्त निवडणुकांच्या वेळीच कशाला, तर देशातील प्रत्येक महिलेला दर महिन्याला दहा हजार रुपये द्या, अशी मागणी करत तुम्ही महिलांना पैसे देता म्हणजे उपकार करत नाही. ते त्यांच्या हक्काचे आहेत, असेही त्यांनी ठणकावले.

पुण्याच्या अजित नागरी पतसंस्था महिला बचत गटातील एक हजार कर्जदार महिलांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभांगी रांजणे, चांदबेबी शेख, सुशीला चांभारे, रहिमा शेख, पारूबाई चव्हाण या महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, आमदार मिलिंद नार्वेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यावेळी उपस्थित होते.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार?

लाडक्या बहिणींनाही तुम्ही एकवीसशे रुपये देणार होते, ते कधी देणार आहात? पंधराशे रुपये देतानाच तुमचे वांदे होत आहेत. तुम्ही महिलांना दीड हजार देत असला तरी त्या तुमच्या पगारी मतदार नाहीत. त्या माझ्या बहिणी आहेत. त्यांना त्यांचे मतस्वातंत्र्य आहे, असे खडे बोलही त्यांनी सुनावले. सध्या महाराष्ट्रात भीषण परिस्थिती असून शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

जसे निवडणुकीच्या आधी दोन-तीन महिन्यांचे हप्ते बँकेत जमा केलेत तसेच पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, महाराष्ट्राच्या महिलांना आता त्याची गरज आहे!

गडगंज उद्योगपती संपत्ती लुटून परदेशात पळाले

सगळे गडगंज उद्योगपती संपत्ती लुटून परदेशात पळाले. नंतर या उद्योगपतींचे कोटय़वधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आली. मात्र शेतकऱयांना कर्जमाफी दिली जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ मदतीची गरज आहे. सत्ता असो किंवा नसो, शिवसेना तुमच्या मदतीसाठी आहे, अशी ग्वाही देतानाच शिवसैनिकांनो, लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे रहा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटली, 15 जणांचा मृत्यू चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटली, 15 जणांचा मृत्यू
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खडकावर आदळून उलटल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये 11 महिला आणि 4...
जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल
दापोलीत व्हेल माशाची उलटी जप्त; एका पोलीस कर्मचाऱ्यासह 4 आरोपींना अटक
दिल्लीत JNU विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांसोबत धक्काबुक्की; 28 विद्यार्थी ताब्यात
Mumbai News – बनावट सोन्याची बिस्किटे देऊन दागिने घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी देता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप, भाविकांमधून तीव्र नाराजी; मंदिर समितीकडून बिव्हिजी कंपनीला नोटीस