मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे कळते.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही इनोव्हा कार मुंबईहून जगन्नाथपुरीकडे निघाली होती. मात्र समृद्धी महामार्गावर वाशिम जवळच्या मालेगाव ते जऊळका दरम्यान कॉरिडॉर क्रमांक 232 जवळ कारचा भीषण अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याच्या कडेचा लोखंडी कठडा तोडून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर कारच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यात दोन जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथकाने धाव घेतली आहे.

ट्रकला लागली आग

दरम्यान, शुक्रवारी दुपारी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रकला अचानक आग लागली. ट्रकपर्यंत पोहोचायला अग्निशमन दलाला उशिर लागल्याने आगीत ट्रक आणि आतील सामान पूर्ण जळून खाक झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू
कामगार चौकात ऑइल टैंकरला वेल्डिंग करत असताना टँकरच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, या टाकीचा...
दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीमने केला निकाह; सोशल मीडियावर फोटो केले शेअर
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता