यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअप गाडीचा भीषण अपघात; सात जण ठार
नंदुरबार येथून अस्तंबा ऋषींच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा चांदशैली घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखरावर अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेवरून परतत असताना चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी उलटली. हा अपघात इतका भयंकर होता की, सात भाविकांचा मृत्यू झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List