झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांची मोठी कारवाई, कार्यक्रमाचे आयोजक, व्यवस्थापकाला अटक

झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांची मोठी कारवाई, कार्यक्रमाचे आयोजक, व्यवस्थापकाला अटक

प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक श्यामकानु महंत आणि त्यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना अटक केली आहे. झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांनी मोठी कारवाई केली, कार्यक्रमाचे आयोजक आणि व्यवस्थापकाला अटक केली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयनुसार महंत यांना सिंगापूरमधून नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तर शर्मा यांना गुरुग्राममधील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांनाही बुधवारी सकाळी गुवाहाटी येथे आणण्यात आले आणि पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

१९ सप्टेंबरला आसाम सरकारने सिंगापूरमध्ये गायकाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष पोलिस महासंचालक एमपी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. एसआयटीने महंत, शर्मा आणि सिंगापूरला गेलेल्या इतरांना नोटिसा बजावल्या. त्यांना तपासात सहकार्य करण्यासाठी आणि त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी यापूर्वी सांगितले होते की, इंटरपोलद्वारे महंत आणि शर्मा यांच्याविरुद्ध ‘लूकआउट नोटिस’ जारी करण्यात आली आहे. नोटिसमध्ये त्यांना ६ ऑक्टोबरपर्यंत गुन्हे अन्वेषण विभागासमोर (सीआयडी) हजर राहण्यास सांगितले आहे.

पोलिस सूत्रांनुसार अटकेनंतर दोघांकडून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपास पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधुमेह असणारे दूध पिऊ शकतात का? की दुधाच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अजून वाढतं? मधुमेह असणारे दूध पिऊ शकतात का? की दुधाच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अजून वाढतं?
ज्यांना शुगर आहे म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे त्यांना त्यांच्या खाण्या-पिण्याबद्दल फार खाळजी घ्यावी लागते. मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहाराबद्दल कूप काळजी...
दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन झाला वाद, दुसऱ्याने केले भयंकर कृत्य
मुंबई एसटी बँकेत संचालकांमध्ये राडा, मिंधे गट आणि सदावर्तेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
Bihar Election 2025 -पैसे, मोफत वस्तू, अमली पदार्थ आणि दारु वापराबाबत सतर्क राहा; निवडणूक आयोगाच्या कडक सूचना
Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना वादळी पावसाने झोडपले, भात कापणीवर परिणाम
बाजार समिती चौकशी समितीचे प्राधिकृत अधिकारी प्रकाश जगताप यांना अखेर हटवले, सहनिबंधक योगीराज सुर्वे आता प्राधिकृत अधिकारी
गाझामध्ये हमासची पुन्हा एकदा क्रूरता, भरचौकात 8 जणांवर झाडल्या गोळ्या