पिंपाने पाणी आणून शेतकऱ्याने उभारले कोकण जलकुंड, काजू बागेला मिळाले जीवदान

पिंपाने पाणी आणून शेतकऱ्याने उभारले कोकण जलकुंड, काजू बागेला मिळाले जीवदान

पाणीटंचाईमुळे दिड-दोन किलोमीटर अंतराचा प्रवास करून मोटरसायकलवरून पाण्याची पिंप भरून आणून ते पाणी शेतात सोडावे लागत होते. अखेर त्या शेतकऱ्याने शेतात कोकण जलकुंड उभारले. आज त्या जलकुंडात ५२ हजार लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्या पाणी साठ्यांवर काजूबागेला जीवदान मिळाले आहे.

कोकणात डिसेंबर महिन्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेती करण्याचा अनेकांचा कल असतो. पुढे सहा महिने पाण्याअभावी ही जमीन पडून रहाते. इच्छाशक्ती असून शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेतात राबता येत नाही. पाण्याअभावी नारळ,आंबा आणि काजू बागायतींचे नुकसान होते अशावेळी कोकण जलकुंड रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीसाठी संजीवनी ठरू शकते.

चिपळूण तालुक्यातील तालुक्यातील ढोकवली येथील युवा शेतकरी राजेंद्र धाकटू गावकर यांने कोकण जलकुंडचा प्रयोग यशस्वी केला आहे. ढोकवली गावातील काजूबागेला पाणी उपलब्ध करण्यासाठी राजेंद्र गावकर यांना वणवण भटकावे लागत होते. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील कोकण जलकुंड योजनेतून एक जलकुंड मंजूर करून घेत शेतात जलकुंड उभारले. प्रत्येकी पाच मीटर लांबी,पाच मीटर रुंदी आणि २ मीटर खोली ठेवून जलकुंडाची उभारणी केली जाते. २५ गुंठे जमिनीमागे एक जलकुंड मंजूर केले जाते. राजेंद्र गावकर यांनी त्यांच्या शेतात एक जलकुंड उभारले आहे त्यामध्ये आता ५२ हजार लीटर पाण्याचा साठा तयार झाला आहे.हे पाणी ते काजू बागायतीसाठी वापरतात.

पूर्वी आम्ही मोटरसायकलवरून पिंप भरून पाणी आणायचो आता कोकण जलकुंडमुळे शेतातच पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यामुळे माझ्या काजू बागेला जीवदान मिळाले आहे
राजेंद्र गावकर, शेतकरी,ढोकवली चिपळूण

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;