पिंपाने पाणी आणून शेतकऱ्याने उभारले कोकण जलकुंड, काजू बागेला मिळाले जीवदान

पिंपाने पाणी आणून शेतकऱ्याने उभारले कोकण जलकुंड, काजू बागेला मिळाले जीवदान

पाणीटंचाईमुळे दिड-दोन किलोमीटर अंतराचा प्रवास करून मोटरसायकलवरून पाण्याची पिंप भरून आणून ते पाणी शेतात सोडावे लागत होते. अखेर त्या शेतकऱ्याने शेतात कोकण जलकुंड उभारले. आज त्या जलकुंडात ५२ हजार लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्या पाणी साठ्यांवर काजूबागेला जीवदान मिळाले आहे.

कोकणात डिसेंबर महिन्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेती करण्याचा अनेकांचा कल असतो. पुढे सहा महिने पाण्याअभावी ही जमीन पडून रहाते. इच्छाशक्ती असून शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेतात राबता येत नाही. पाण्याअभावी नारळ,आंबा आणि काजू बागायतींचे नुकसान होते अशावेळी कोकण जलकुंड रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीसाठी संजीवनी ठरू शकते.

चिपळूण तालुक्यातील तालुक्यातील ढोकवली येथील युवा शेतकरी राजेंद्र धाकटू गावकर यांने कोकण जलकुंडचा प्रयोग यशस्वी केला आहे. ढोकवली गावातील काजूबागेला पाणी उपलब्ध करण्यासाठी राजेंद्र गावकर यांना वणवण भटकावे लागत होते. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील कोकण जलकुंड योजनेतून एक जलकुंड मंजूर करून घेत शेतात जलकुंड उभारले. प्रत्येकी पाच मीटर लांबी,पाच मीटर रुंदी आणि २ मीटर खोली ठेवून जलकुंडाची उभारणी केली जाते. २५ गुंठे जमिनीमागे एक जलकुंड मंजूर केले जाते. राजेंद्र गावकर यांनी त्यांच्या शेतात एक जलकुंड उभारले आहे त्यामध्ये आता ५२ हजार लीटर पाण्याचा साठा तयार झाला आहे.हे पाणी ते काजू बागायतीसाठी वापरतात.

पूर्वी आम्ही मोटरसायकलवरून पिंप भरून पाणी आणायचो आता कोकण जलकुंडमुळे शेतातच पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यामुळे माझ्या काजू बागेला जीवदान मिळाले आहे
राजेंद्र गावकर, शेतकरी,ढोकवली चिपळूण

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल तुमच्या आजुबाजूला असलेल्या या 10 गोष्टी असतात जंतूंनी भरलेल्या; तुम्ही त्यांना दररोज स्पर्श करता, जाणून धक्का बसेल
दिवसभर आपण बरीच काम करत असतो, प्रवास करत असतो. धुळ, प्रदूषण यामुळे नक्कीच आपण अनेक जंतूंच्या संपर्कात येतो. मग ते...
बीडमध्ये अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एकाचा मृत्यू, एक गंभीर
फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शनचा वापर का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
निवडणूक आयोगाशी काय झाली चर्चा? राज ठाकरे यांनी ट्वीट करत दिली माहिती
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबादला होण्याची शक्यता, 20 वर्षांनंतर हिंदुस्थानला मिळणार यजमानपद?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम, एअरस्ट्राईकमध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू
बीडचे वादग्रस्त जेलर पेट्रस गायकवाड यांची बदली