‘मतचोरी’चा मुद्दा देशात सर्वात महत्त्वाचा, महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या – राहुल गांधी

‘मतचोरी’चा मुद्दा देशात सर्वात महत्त्वाचा, महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या – राहुल गांधी

देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘मतचोरी’चा आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या आहेत, असं म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

मणिपूरमध्ये 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारावरून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अखेर आता दोन वर्षांनी पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ मिळाला असून उद्या म्हणजेच 13 सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, “मणिपूरमध्ये बऱ्याच काळापासून समस्या आहेत, पण नरेंद्र मोदी आता तिथे जात आहेत. मात्र आज देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘मतचोरी’चा आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या आहेत. आज संपूर्ण देश नरेंद्र मोदींना मतचोर म्हणत आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – थकित कर्जदारांविरोधातील आमची कारवाई योग्य, राजापूर अर्बन बॅंक आपल्या भूमिकेवर ठाम Ratnagiri News – थकित कर्जदारांविरोधातील आमची कारवाई योग्य, राजापूर अर्बन बॅंक आपल्या भूमिकेवर ठाम
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील थकित कर्जदारांविरोधात कर्जवसुली प्रकरणी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये रत्नागिरी...
आदित्य ठाकरे यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, पागडीअंतर्गत येणाऱ्या मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत चर्चा
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! सरकारचे एक पाऊल मागे, पोलीस भरतीसाठी वाढवली वयोमर्यादा
Sindhudurg News – सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट वाहतुकीसाठी खुला होणार
आफ्रिकन देश काँगोत मोठी दुर्घटना, बोट उलटून ८६ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये! Delhi मेट्रोमध्ये कपलचं भांडण, Video व्हायरल
चार्ली कर्क यांच्या मारेकऱ्याला अटक, ट्रम्प म्हणाले, फाशीची शिक्षा व्हायला हवी