भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तर कधीतरी नेपाळ होणारच! संजय राऊत कडाडले, मिंध्यांची सालटी काढली

भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तर कधीतरी नेपाळ होणारच! संजय राऊत कडाडले, मिंध्यांची सालटी काढली

भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच, असा सावधगिरीचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत दिला. या विधानानंतर महाराष्ट्रात मिंधे गटाने राऊत यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. याचा संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करून खरपूस समाचार घेतला आहे. नेपाळच्या तरुणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला. भ्रष्ट शासन कर्त्याना रस्त्यावर आणले. त्यामुळे एकजात सगळे मिंधे लोक घाबरणारच! ये डर अच्छा है! अशा शब्दात संजय राऊत यांनी मिंध्यांची सालटी काढली.

संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “महाराष्ट्रात आणि देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नेपाळी तरुणांचा लढा भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध असल्याचे मी सांगताच महाराष्ट्रात मिंधे गटाने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आज हेच मूर्ख लोक पोलीस आयुक्तांना भेटून माझ्यावर कारवाईची मागणी करत आहेत; खुशाल करा अशी मागणी! हे लोक घाबरले आहेत! भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच, ये डर अच्छा है!”, असे संजय राऊत म्हणाले.

सावधान! अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते; नेपाळमधील अराजकतेवरून संजय राऊत यांचा इशारा

तसेच नेपाळच्या तरुणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला. भ्रष्ट शासन कर्त्याना रस्त्यावर आणले. त्यामुळे एकजात सगळे मिंधे लोक घाबरणारच! असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मिंधे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बीजेपी मुंबईलाही टॅग केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन
कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात