80 वर्षीय माजी राष्ट्रपतींना रिकामा करावा लागला सरकारी बंगला, वाचा नेमकं कारण काय?

80 वर्षीय माजी राष्ट्रपतींना रिकामा करावा लागला सरकारी बंगला, वाचा नेमकं कारण काय?

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका नव्या कायद्यामुळे एका माजी राष्ट्रपतींना सर्व सरकारी सुविधांना रामराम करावा लागत आहे. माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे गेल्या 10 वर्षांपासून त्या सरकारी बंगल्यात वास्तव्यास होते. मात्र नुकताच लागू झालेल्या नव्या कायद्यामुळे माजी राष्ट्रपतींना राजधानी कोलंबोमधील आलिशान घर सोडावे लागणार आहे.

श्रीलंकेत माजी राष्ट्रपतींच्या सरकारी सुविधा काढूण घेणारा Presidents’ Entitlement (Repeal) Act नावाचा एक नवीन कायदा मंजूर करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत माजी राष्ट्रपतींना त्याच्या सरकारी सुविधांवर पाणी सोडावे लागणार आहे. या काद्याअंतर्गत माजी राष्ट्ररपतींना सरकारी निवासस्थान, मासिक भत्ता, सुरक्षा कर्मचारी, वाहन, सचिवालय सुविधा आणि इतर फायदे मिळणे बंद झाले आहे.

श्रीलंकेत लागू झालेल्या या काद्यामुळे आता देशातील इतर माजी राष्ट्रपतींना देखील सरकारी निवासस्थान रिकामे करावे लागेल. माजी राष्ट्रपती चंद्रिका कुमार तुंगा यांना देखील सरकारी निवासस्थान सो़डावे लागणार आहे. मात्र आता त्यांनी सध्याच्या सरकारकडून घर रिकामे करण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ मागितला आहे.

गेल्या वर्षी श्रीलंकेत निवडणुका झाल्या. तेव्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणारे अनुरा कुमार दिसानायके यांनी देशातील जनतेला काही वचनं दिली होती. त्यापैकीच एक म्हणजे ते माजी राष्ट्रपतींच्या खर्चाला आळा घालतील. त्यांच्या या आश्वासनाला श्रीलंकेच्या जनतेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता या सरकारने माजी राष्ट्रपतींवर होणाऱ्या खर्चाला ब्रेक लावण्यासाठी नवीन कायदा आणला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन
कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात