आपल्या राज्यकर्त्यांनी नेपाळमधल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पहावं, संजय राऊत यांचे विधान

आपल्या राज्यकर्त्यांनी नेपाळमधल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पहावं, संजय राऊत यांचे विधान

प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांवर भाजप आणि मिंधे गटाच्या नेत्यांचा दबाव आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आपल्या राज्यकर्त्यांनी नेपाळमधल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पहावं असेही संजय राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सोलापुरात पोलिसांवर दबाव कुणी आणला हे उघड झालं आहे. अशा प्रकारचे दबाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत मग ते भाजप असेल किंवा मिंधे सेना असेल. या लोकांनी नेपाळच्या उद्रेकाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे आम्ही नेपाळमध्ये पाहिलं आहे. राज्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून मारलं आहे. हे या राज्यात आणि देशात होऊ नये. सहनशीलतेचा एक बिंदू असतो, एक अंत असतो. पुणे आणि नाशिकमध्ये त्या अंताने टोक गाठलं आहे. पुण्यातही आम्ही विराट मोर्चा काढणार आहोत. लोकं यांना कंटाळलेली आहेत. लोकांनी यांना निवडूनही दिलेले नाही, पण व्होट चोरीच्या माध्यमातून हे लोक सत्तेवर आले आहेत आणि सत्तेच्या जोरावर हे बेबंद आणि बेफाम झाले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल. नाशिकनंतर इतर शहरांत अशा प्रकारचे जनआक्रोश मोर्चे काढावे लागतील असे संजय राऊत म्हणाले.

कार्यकर्ते एकत्र आल्याशिवाय असे आंदोलन होत नाही. नाशिकमध्ये या मोर्चाचे आयोजन शिवसेना करत होती, त्यावेळी आमच्या लोकांनी असं सुचवलं की, की आपण मनसेलाही सोबत घेतलं पाहिजे. त्यातूनच हा मोर्चा निघतोय. आंदोलन करण्याची जमिनीवरची ताकद या दोन पक्षांचीच आहे असेही संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं आहे की, जीआरमध्ये सरसकट हा शब्द वापरलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते हळूहळू ते बाहेर पडत आहे. त्यामुळे मला भिती आहे की, मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली तर या राज्यात अराजक निर्माण होईल. मला अशी भिती आहे की या राज्यात जातीय अराजकता निर्माण होऊ शकते.

कर्नाटकात एका स्थानकाला शिवाजी महाराजांचं होतं ते बदलण्यात आलं आहे. याबाबत आम्ही तर बोलूच पण आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोलावं. याबाबत हे सरकार काय करत आहे, इथल्या काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांनी, एकनाथ शिंदे यांनीही त्या संदर्भात केंद्राला कळवायला पाहिजे असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन
कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात