अखेर दोन वर्षांनी पंतप्रधानांना वेळ मिळाला, उद्या मोदी मणिपूरला भेट देणार

अखेर दोन वर्षांनी पंतप्रधानांना वेळ मिळाला, उद्या मोदी मणिपूरला भेट देणार

मणिपूरमध्ये 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारावरून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. पंतप्रधान मोदींनी या हिंसाचारानंतर अनेक महिने त्यावर मौन बाळगलं होतं. गेल्या दोन वर्षातमोदी अनेकदा परदेश दौऱ्यावर गेले मात्र गेल्या दोन वर्षात त्यांनी एकदाही मणिपूरला भेट दिलेली नाही. त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली होती. अखेर आता दोन वर्षांनी पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ मिळाला असून उद्या म्हणजेच 13 सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत.

मणिपूरमध्ये 2023 पासून सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक महिने चाललेल्या या हिंसाचारात अनेक महिलांवर बलात्कार झाले, अनेकांच्या हत्या झाल्या. दोन वर्षाहून अधिक काळापासून मणिपूर धगधगत आहे.

मणिपूरमधल्या 8500 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये येणार आहेत. मणिपूरचे मुख्य सचिव पुनित कुमार यांनी ही माहिती दिली. सर्वात आधी ते मणिपूरमधील चुरंचदपूर येथे जाणार आहेत. तेथे ते 7300 कोटींच्या विविध कामांचे भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर राजधानी इंफाळमधील 1200 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये! Delhi मेट्रोमध्ये कपलचं भांडण, Video व्हायरल तुझ्यासारखा बॉयफ्रेंड कोणालाच मिळू नये! Delhi मेट्रोमध्ये कपलचं भांडण, Video व्हायरल
दिल्ली मेट्रो गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. चर्चेच कारण ठरतायत दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणारे दिल्लीकर. कारण मेट्रोमधून...
चार्ली कर्क यांच्या मारेकऱ्याला अटक, ट्रम्प म्हणाले, फाशीची शिक्षा व्हायला हवी
सुशीला कार्की होणार नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान, थोड्याच वेळात पार पडणार शपथविधी सोहळा?
मीच होणार बिहारचा पुढील मुख्यमंत्री, तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला विश्वास
Gen Z आंदोलकांनी हॉटेलला आग लावली, पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या हिंदुस्थानी महिलेचा मृत्यू
IND Vs PAK Asia Cup 2025 – पाकिस्तानशी क्रिकेट आणि व्यापार करू नये, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका
‘मतचोरी’चा मुद्दा देशात सर्वात महत्त्वाचा, महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या – राहुल गांधी