रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून वापरल्या जाणाऱ्या तिळाची शेती पूर्वी भात आणि नाचणीसोबत केली जायची. मात्र, आता ही परंपरा झपाट्याने लोप पावत असून, स्थानिक पातळीवर या शेतीच्या संवर्धनाची नितांत गरज भासत आहे.

पूर्वी ग्रामीण भागात तिळापासून तेल काढून अन्नात वापरण्याची पद्धत होती. हे तेल शुद्ध आणि गुणकारी समजले जाई. त्यामुळे शेतकरी घरातच तयार होणाऱ्या तेलामुळे स्वयंपूर्ण होते. सपाट भागावर तिळाचे झाडे फुलताना संपूर्ण परिसर पिवळसर फुलांनी सजलेला दिसे. आज मात्र तिळाची शेती हळूहळू मागे पडताना दिसत आहे. वाढते औद्योगीकरण, बदलते हवामान, आधुनिक शेतीच्या पद्धती आणि बाजारपेठेतील बदलते तांत्रिक निकष यामुळे या पारंपरिक शेतीचा ऱ्हास होत आहे. पूर्वी भातशेतीबरोबर पूरक शेती म्हणून केली जाणारी तिळाची लागवड आता जवळजवळ थांबली आहे.

शेतीच्या या प्रकाराचे जतन न झाल्यास ही परंपरा काळाच्या ओघात नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन, कृषी विभाग व स्वयंसेवी संस्थांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तिळाच्या शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची आखणी करून शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत दिल्यास ही शेती टिकवणे शक्य आहे. ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे जतन करत पारंपरिक शेतीचे संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या
धावपळीच्या जगात प्रत्येकाला फिट, तंदुरुस्त राहावे वाटते. प्रत्येकाला डोलेशोले तयार करायचे नाहीत. पण सुटलेले पोट आणि थकलेले चेहरा अनेकांना नको...
मुंबईत स्पाइसजेटच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, उड्डाणानंतर निघालं चाक
अखेर दोन वर्षांनी पंतप्रधानांना वेळ मिळाला, उद्या मोदी मणिपूरला भेट देणार
Asia Cup 2025 – पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने संघाची साथ सोडली
रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला