मुख्यमंत्रीच शब्द पाळत नसतील तर जनतेने आपली कैफियत कुणाकडे मांडायची ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

मुख्यमंत्रीच शब्द पाळत नसतील तर जनतेने आपली कैफियत कुणाकडे मांडायची ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील हिंजवडी परिसरातील रस्त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्या रस्त्याची वाईट अवस्था व्यवस्थित दिसून येत आहे. तब्बल दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रस्त्यासाठी बैठक घेऊन 15 दिवसात रस्त्याची डागडुजी करू असे सांगितले होते. मात्र अद्याप तो रस्ता जसा होता तसाच आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना फटकारले आहे

हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक रोड परिसरातील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. थोड्याबहुत फरकाने परिसरातील सर्वच रस्त्यांची हीच स्थिती आहे. विशेष म्हणजे 10 जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन पुढील 15 दिवसांत म्हणजे साधारणतः 25 जुलैपर्यंत रस्त्यांची स्थिती सुधारण्याबाबत निर्णय घेणार असे सांगितले होते. याला आज दीड महिन्यांहून अधिक उलटून गेला आहे परंतु अद्यापही या भागातील रस्त्यांची स्थिती जशीच्या तशी आहे. शासनाने किमान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द पाळायला हवा. कारण जनतेला मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा आधार असतो. हा शब्दच पाळला जाणार नसेल तर जनतेने आपली कैफियत कुणाकडे मांडायची ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘गोकुळ’मध्ये पावणेदोन कोटीचा जाजम, घड्याळ खरेदी घोटाळा, संचालक मंडळ बरखास्त करा; शिवसेनेची मागणी ‘गोकुळ’मध्ये पावणेदोन कोटीचा जाजम, घड्याळ खरेदी घोटाळा, संचालक मंडळ बरखास्त करा; शिवसेनेची मागणी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील पाच हजार 831 दूध संस्थांसाठी तीन कोटी 74 लाखांचे विनाटेंडर खरेदी केलेले...
नारळ 41 हजार, कोथिंबिरीची जुडी 20 हजारांना; शिरगावातील पारायण सोहळ्यानंतरच्या लिलावात ग्रामस्थांची भक्तिभावाची चढाओढ
मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात सरकारने स्पष्टता आणावी, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी
रस्त्याचे चौपदरीकरण करताना भिंतीची अडचण, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राहत्या घराची भिंत तोडण्याचे दिले आदेश
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक का होत आहे? धनखड गेले कुठे? काँग्रेसची सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
10 हजार कोटींची संपत्ती असूनही सून गेली झोपडपट्टीत राहायला! तिने स्वतःच उघड केलं गुपित
… तर शेवट चांगला होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांचा हिंदुस्थानला इशारा