CBI Raid – अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ, ईडीनंतर आता सीबीआयकडून छापेमारी

CBI Raid – अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ, ईडीनंतर आता सीबीआयकडून छापेमारी

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ईडीनंतर आता सीबीआयनेही अनिल अंबानी यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. यानंतर शनिवारी सीबीआयचे पथक मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. आरकॉम आणि अनिल अंबानीशी संबंधित ठिकाणी ही शोध मोहीम सुरू आहे. एसबीआयच्या तक्रारीनंतर सीबीआय ही छापेमारी करत आहे.

याआधी ईडीने अनिल अंबानी यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर काही दिवसांनी ही शोध मोहीम हाती घेण्यात आली. सीबीआयने अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 6 ठिकाणी छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने कंपनीविरुद्ध बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कर्ज घोटाळ्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. एसबीआयने 13 जून 2025 रोजी याला “फसवणूक” म्हणून वर्गीकृत केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या फसवणूक जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे आणि बँकेच्या बोर्ड-मंजूर धोरणानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर, 24 जून 2025 रोजी बँकेने आरबीआयला कळवले आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. आता सीबीआयने औपचारिक गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी बँक फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांची चौकशी केली होती. ही चौकशी नवी दिल्लीतील ईडी मुख्यालयात करण्यात आली. यावेळी 17,000 कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याबाबत अनिल अंबानी यांची अनेक तास चौकशी करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट