पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा धरणार; घटस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा धरणार; घटस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

गुप्तपणे रेकॉर्ड केलेले पत्नीचे कॉल वैवाहिक वादात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावला.

पत्नीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होते आणि त्यामुळे रेकॉर्ड केलेले कॉल पुरावा म्हणून मानले जाऊ शकत नाही, असे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, विवाहित जीवनात गोपनीयतेचा अधिकार पूर्ण केला जाऊ शकत नाही. कलम 122 अंतर्गत, पती-पत्नीमधील संभाषण न्यायालयात उघड करता येत नाही, परंतु घटस्पह्टासारख्या प्रकरणांमध्ये ते अपवाद मानले जाते. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले की, गोपनीयतेच्या अधिकाराचे कोणतेही उल्लंघन झाले आहे असे  वाटत नाही.’

प्रकरण काय

हा खटला भटिंडा येथील कौटुंबिक न्यायालयात सुरू झाला. काwटुंबिक न्यायालयात पतीने  त्याच्या पत्नीशी झालेल्या संभाषणाच्या रेकार्ंडगच्या आधारे घटस्पह्टासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने कॉल रेकार्ंडगला पुरावा म्हणून स्वीकारले. पत्नीने या निर्णयाला पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने याला गोपनीयतेचे उल्लंघन म्हटले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपचे धंदो प्रथम, पण स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिंधे कुठे आहेत? अंबादास दानवे यांचा सवाल भाजपचे धंदो प्रथम, पण स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिंधे कुठे आहेत? अंबादास दानवे यांचा सवाल
पाकिस्तानसोबत आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यास आपला आक्षेप नाही असे विधान केंद्रीय क्रिडामंत्री मनसूख मांडविया यांनी केले आहे. त्यावर भाजपचे धंदो प्रथम...
पावसाळ्यात महिनाभर मांसाहार सोडल्यास शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या
आता घरीच बनवा मेयोनीज, फ्रेश क्रीम आणि खूप काही..
कोथिंबीर खराब होत असेल तर हे करून पहा…
लाडक्या बहिणीचे संसार उध्वस्त करणारे महायुती सरकारचे धोरण, दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने
टेस्लाचे हिंदुस्थानात आगमन, मुंबईत पहिलं शोरुम उघडलं