कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलेले नाही…; अजित पवारांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं
महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी सामान्य जनतेला अनेक आश्वासने दिली. त्यातील महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी यावर त्यांनी भर दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी अशी भंपक आश्वासनं देणाऱ्या सरकारने आता उघडपणे पलटी मारली आहे. विरोधकांकडून सतत होणाऱ्या प्रश्नांच्या भडीमारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिला.
कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलेले नाही…; अजित पवारांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं#ajitpawar pic.twitter.com/Gw4RApxC1z
— Saamana Online (@SaamanaOnline) May 2, 2025
शेतकरी कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना काढता पाय घेतला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन तुम्हाला कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी तरी दिलेलं नाहीए, असं म्हणत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. लाडकी बहीण योजनेचं आम्ही नियोजन केलं आहे. आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केलं असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेसुद्धा अतिरेकीच!
शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही! अजित पवार यांनी पलटी मारली
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List