तोडफोडीमुळे ‘इंद्रायणी’चा घाट बनला विद्रूप, विकासाच्या नावाखाली खोदकाम

तोडफोडीमुळे ‘इंद्रायणी’चा घाट बनला विद्रूप, विकासाच्या नावाखाली खोदकाम

देहू आळंदी परिसर विकास समितीच्या माध्यमातून विकसित झालेल्या दगडी घाटाचे जेसीबीच्या मदतीने ब्रेकर लावून ड्रेनेज लाइनसाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इंद्रायणीचा घाट विद्रूप बनला आहे. आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू असलेल्या या कामामुळे पावसाळ्यात महापुराच्या स्थितीमध्ये घाटास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने हे काम थांबवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी केली आहे.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च करून घाटाचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टिकोनातून नियोजनबद्ध दगडी घाट बांधण्यात आला आहे. या घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्याकरिता स्वतंत्र भूमिगत लाइनचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असताना संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांच्याशी चर्चा न करता रात्रीच्या वेळी या घाटाजवळ जेसीबीने तोडफोड केल्याने भाविक, नागरिकांसह विविध सेवाभावी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आळंदी शहरातील सांडपाणी पुंडलिक मंदिरालगत उघड्यावर वाहते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ते बंदिस्त करण्याचे काम सुरू आहे. ही सांडपाणी वाहिनी पुढे एसटीपी प्रकल्पास जोडली जाणार आहे. त्यामुळे सांडपाणी नदीत मिसळणार नाही. त्यामुळे सांडपाणी वाहिनीचे काम झाल्यावर घाटाचे काम पूर्ववत नगरपरिषदेकडून केले जाईल, असे बांधकाम अभियंता सचिन गायकवाड यांनी सांगितले.

यासंदर्भात माईर्स एमआयटीचे संचालक डॉ. महेश थोरवे म्हणाले, संस्थेने ज्या पद्धतीने दगडी घाट बांधकाम केले आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात महापुराच्या स्थितीमध्ये घाटास धोका होऊ शकतो. यामुळे घाट खचून जीवितहानी होण्याची भीती आहे. तसेच या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे रक्षाविर्सजन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे हे खोदकाम थांबवून पर्यायी मार्ग काढावा.

केवळ विकासकामासाठी उपलब्ध निधी खर्ची टाकण्याचा घाट यातून सुरू असून, विकासाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी सुरू आहे. हे काम तत्काळ थांबविण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी यांच्याकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;