महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे; जयंत पाटील यांनी लगावला टोला

महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे; जयंत पाटील यांनी लगावला टोला

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. या जागेवर अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी दावा केला होता. मात्र, उमेदवारी जाहीर होत नसल्याने अखेर त्यांनी या मतदारसंघातून माघार घेतली. या जागेचा तिढा सुटला नसलेलाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी छगन भुजबळ यांना जबरदस्त टोला लगावला आहे.

भाजपने पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून उभे करेन असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघातील निवडणुकीकडे लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी फक्त बीडमध्ये लक्ष द्यावे, असे सुनावले.

महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा, भुजबळांनी जागेवर केलेला दावा, त्यानंतर घेतलेली माघार आणि आता पंकजा मुंडे यांच्या विधानावर दिलेली प्रतिक्रिया यावरून जयंत पाटील यांनी भुजबळांना जबरदस्त टोला लगावला आहे. महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. आमच्याशी भुजबळांची काही चर्चा झालेली नाही. मात्र, तिकडे त्यांची खूप अवहेलना होत आहे, त्यांची काळजी वाटते, असा टोला जयंत पाटील यांनी छगन भुजबळांना लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाकरे गटावर शोककळा, पोलिंग बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू ठाकरे गटावर शोककळा, पोलिंग बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण तापलेलं बघायला मिळालं. या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. सध्या उन्हाळा असल्यामुळे...
जालन्यात अवकाळी पाऊस व वार्‍यांमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान
मतदारांवर दबाव असूनही रांगा लावून मतदान केलं! आदित्य ठाकरेंकडून मुंबईकरांचं कौतुक
IPL : महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्ती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर
IPL 2024 : ‘हा’ संघ ट्रॉफीवर कोरणार आपलं नाव, सुरेश रैनाचं भाकित खरं ठरणार?
किर्गिस्थान मध्ये अडकले यवतमाळचे 5 विद्यार्थी, पालक चिंतेत; पाल्याना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी
मुंबईतील मतदारांसाठी खुशखबर! बोटावरची शाई दाखवून ‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळणार 20 टक्के सवलत