मोदींना शिंगावर घेतल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

मोदींना शिंगावर घेतल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

‘मेरा परिवार, मेरा परिवार’ असे नरेंद्र मोदी म्हणत आहेत. मात्र, देशातील तरुण बेरोजगार आहेत. मोदी एके मोदी हाच त्यांचा परिवार आहे. मोदींविरोधात राज्यातील आणि देशातील शेतकरी पेटून उठले आहेत. आता मोदींना शिंगावर घेतल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. आता गद्दारांच्या खुर्चीला मशाल लावण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मोदींनी काय केले हेच ते सांगत नाहीत. मोदींचे नाणे आता महाराष्ट्रात चालत नाही. हिंमत असेल तर मोदींचे फोटो लावून मत मागे. मोदींची हवा आता संपलेली आहे. मोदी, शहांनी त्यांच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगावा, असे आव्हानही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्धव ठाकरे नांदेडमध्ये सभेत बोलत होते.

देशात सध्या हुकूमशाही आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यश्र जे.पी. नड्डा म्हणाले होते, देशात एकच पक्ष राहील, त्यांची ही एकाधिकारशाही मान्य आहे काय. ते शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत, त्यांचे अंधभक्त आहेत, त्यांचीही हीच अवस्था आहे. त्यांना 400 जागा संविधान बदलण्यासाठीच हवी आहे. कलम 370 काढण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. अनेक चांगल्या गोष्टींना पाठिंबा दिला. त्यांना 400 जागा फक्त संविधान बदलण्यासाठीच हव्या आहेत. त्यांनी संसदेत विरोधी पक्षातील 150 खासदारांना निलंबित केले. त्यानंतर त्यांनी हवी तशी मनमानी पद्धतीने विधेयके मंजूर करून घेतली. आता त्यांना 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या,तर ते संविधान बदलण्याची भीती आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आता त्यांना 400 जागा संविधान बदलण्यासाठीच हव्या आहेत. संविधान बदलल्यानंतर विरोधात कोणीही बोलायला नको. रशिता पुतीन यांनी जे केले तेच सध्या देशात होत आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्राची लूट थांबवणार, महाराष्ट्रचे लुटून नेलेले वैभन पुन्हा महाराष्ट्रात आणणार, शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणार, पीकविमा घोटाळा आहे, कोट्यवधी रुपये विमाकंपन्यांकडे जात आहेत. त्यांनी विमा कंपन्यांकडूनही निवडणूक रोखे घेतले असतील तर ते गंभीर आहे. हुकूमशाही सरकार हवे की संमिश्र आणि प्रत्येक प्रातांचे सन्मान राखण्याचे सरकार हवे आहे, याचा विचार आता जनतेने करायचा आहे, असेही ते म्हणाले.

दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे टाकून, बंदूका ऱोखून अडवले. आता राज्यातील शेतकरी मोदी सरकारचा दिल्लीत जाणारा रस्ता बंद करेल. देशातील आणि राज्यातील शेतकरी आता शेतकरी म्हणून मतदान करेल आणि भाजपचा दिल्लीचा रस्ता रोखेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था